पुणे : अमोल कोल्हे यांना खासदारकी मी दिली आहे. त्याला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं आहे. त्यांना खासगीत सांगा कधी तरी ? ते मधल्या काळामध्ये सहाही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पुर्णपणे दुलर्क्ष केलेला आहे. त्याठिकाणी दिलेला उमेदवार निवडूनच आणून दाखवतो. असं म्हणत अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांना पाडणारच अशी भाषा वापरली होती. त्यावर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांना जोरदार टोला लगावला आहे.
हेही वाचा…“डॉ. पंजाबराव देशमुखांना भारतरत्न पुरस्कार मिळावा,” देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली इच्छा
अमोल कोल्हे यांची शेतकऱ्यांसाठी संघर्ष यात्रा किल्ले शिवनेरीपासून सुरू झाली आहे. यादरम्यान झालेल्या सभेत जयंत पाटलांनी अजित पवारांना खोचक टोला हाणला आहे. आज काही लोकं अमोल कोल्हे यांना पाडण्याची भाषा करीत आहेत. ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना घरोघरी पोहचवण्याचं काम अमोल कोल्हे यांनी केलं आहे. त्यांचा पराभव करणं मित्रांनो एवढं सोप्प नाही. असा इशारा जंयत पाटलांनी अजित पवारांना दिला आहे.
हेही वाचा…“मी परत खासदार झालं पाहिजे अशी लोकांची इच्छा”, लोकसभा लढण्याची खैरेंनी व्यक्त केली पुन्हा इच्छा
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघानंतर अजित पवारांनी आपला मोर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे वळविला आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना पाडणारच अशी भाषा अजित पवारांच्या तोंडून निघत आहेत. तर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी शिरूर मतदारसंघात जाऊन विकासकामांची पाहणी केली. यामुळे त्यांच्या विधनाला अधिकच बळ मिळालं. त्यावर देखील अमोल कोल्हे यांनी जास्त काही प्रतिक्रिया न देता सौम्य भाषेत अजित पवारांना सुनावलंय.
READ ALSO :
हेही वाचा“काँग्रेसचं ‘है तयार हम’ अभियान नेमकं कशासाठी?” भाजपने काॅंग्रेसला विचारले ‘हे’ पाच प्रश्न
हेही वाचा…“देशात कुणी अशी धडक मारली नसेल तशी मुंबईत धडक मारा”, जरांगे पाटलांनी मुंबईत जाण्याचा सांगितला मार्ग
हेही वाचा.महायुतीतून कधी बाहेर पडणार ? बच्चू कडूंनी थेट स्पष्टच सांगितलं
हेही वाचा“वय अन् वास्तव माहिती नसल्यामुळे ‘त्या’ अजितदादावर आरोप करताहेत”, शालिनीताई पाटलांना अजित पवार गटाचं प्रत्युत्तर
हेही वाचालोकसभा निवडणुकीसाठी वंचितसोबत युती करणार की नाही ? शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले..