मुंबई : आज अंतिम वर्षातील परीक्षा व निकालाबाबत तांत्रिक अडचणी सोडविण्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर व कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांना विद्यार्थ्यांच्या तक्रारींवर तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करून जवळपास ८०० तक्रारींसह युक्रांदच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या आहेत, त्यात विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं होत, अजूनही असे खूप विद्यार्थी आहेत कि ज्यांच्या परीक्षा सबमिट झालेल्या नाहीत, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा काय अधिकार आहे? कोरोनाच्या साथीपेक्षा ही विद्यापीठाचा परीक्षा घेण्याचा ढिसाळ कारभार अधिक छळतो आहे, अशी भूमिका घेत युवक क्रांती दलाच्या शिष्टमंडळाने आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन कानउघाडणी केली आहे.
यापूर्वीही विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत विद्यापीठ प्रशासणास भेटून तक्रारी केलेल्या आहेत. तसेच दररोज याबाबत तक्रारी विद्यापीठाच्या प्रशासनाला पाठविण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असूनही काही विषयांमध्ये शून्य गुण मिळालेले आहेत, काही विषयांमध्ये गैरहजर दाखवले आहे, परीक्षा चांगली जाऊनही खूप कमी गुण मिळाले आहेत, एकूण गुणांची बेरीज कमी येणे, निकाल जाहीर झाला असूनही निकाल दाखवला जात नाही, जय विद्यार्थ्यांना परीक्षा देताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु पुन्हा परीक्षा देताना काही विद्यार्थ्यांना ई-मेल प्राप्त झाले नव्हते अशा विविध प्रकारच्या अडचणींमुळे निकाल नापास आलेला आहे.
अशा अनेक विषयांच्यां तक्रारीसंदर्भात चर्चा केली असून यावर कुलगुरू यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी गुगल फॉर्म द्वारे माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. याबाबत त्वरित परिपत्रक काढण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच बहिस्थ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याबाबत सुध्दा चर्चा केली असून निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे, ऑनलाईन एन्ट्रान्स परीक्षेची मेरिट लिस्टही जाहीर करण्याची मागणी केली आहे. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या समस्यांबाबत दोन ते तीन दिवसांत त्वरित निर्णय घेतल्यास व संबधीत समस्या न सोडविल्यास युवक क्रांती दलाच्या वतीने तीव्र विद्यार्थी आंदोलन करण्यात येईल असा इशारा कुलगुरू यांना देण्यात आला. या शिष्टमंडळात युक्रांदचे राज्यसंघटक जांबुवंत मनोहर, पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे, पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे, प्रा. नीलम पंडित उपस्थित होते.
Read Also ;
मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा भाजपाचा प्रयत्न; संजय राऊतांचा आरोप
…मग तुम्ही सत्तेत कशासाठी बसला आहात?, चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला सवाल
फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही: जयंत पाटील
भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
शिवसेनेच्या वचननाम्यातील ३० टक्के विज दर कपातीचे आश्वासन कागदावरच
“खोटे बोलण्याच्या आणि जनतेला फसवण्याच्या सवयीमुळे जनतेने भाजपला सत्तेवरून दूर केले “