मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्याने तर राज्यातील राजकीय गणित बदलले आहेत. यातच आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीवरती दावा ठोकल्याने राज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट असा तयार झालाय. नाशिक मध्ये दोन गटात प्रचंड राडा देखील झाला. यातच आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून मोठे गौप्यस्फोट करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा हा भाजपला देण्याचा निर्णय घेतला होता परंतु ते पत्र जयंत पाटलांनी शरद पवारांकडे पाठवलंच नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का, पक्ष स्थापनेपासून असलेल्या नेत्यांनी सोडली साथ
राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी काल एक राष्ट्रवादीबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला होता. एकनाथ शिंदे गुहाटी ला असताना राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांच्या भाजपला पाठिंबा देण्याचं आमदारांचं सह्यांचे पत्र तयार करण्यात आला होता. असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं होतं. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपली प्रतिक्रिया देतानी यावर भाष्य केला आहे.
हेही वाचा…अजित पवारांकडे अर्थमंत्री पद ? शिंदे गटात मोठी अस्वस्थता , राजकीय करीअर धोक्यात, आमदारांची भावना?
एकनाथ शिंदे गुवाहाटीला असतांना भाजपला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीचं पत्र तयार करण्यात आलं होतं. पंरतु ते पत्र जयंत पाटलांनी शरद पवारांकडे दिलंच नाही. त्यावेळी शरद पवार साहेबांना किती वाईट वाटेल हे जयंत पाटलांना माहिती होतं. परंतु शरद पवारांना एकटे सोडा आणि विषय संपवा. असं दिलीप बनवकर यांनी म्हटलं होतं. असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीत संघर्ष पेटला..! दोन गटात मोठा राडा, शरद पवार अन् अजित पवार गट आमनेसामने
हेही वाचा…“माझ्या परवानगीशिवाय फोटो वापरू नका,” शरद पवारांचा अजित पवारांना “दे धक्का”
हेही वाचा…“मुख्यमंत्री ‘या’ नात्याने अंतिम निर्णय ‘एकनाथ शिंदे’ घेतील”, पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…अजित पवार वित्तमंत्री झाले तर विरोधकांच्या कामांना स्थगिती देणार का ?
हेही वाचा…बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे मैदानात, महाराष्ट्र दौऱ्याचा कार्यक्रम ठरला