मुंबई : एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि दोघांनी मिळून अर्धी केलेली उरलीसुरली कॉंग्रेस यांची तीनचाकी ऑटोरिक्षा महाराष्ट्राचा विकास करू शकणार नाही. असा हल्लाबोल काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…“ताई काळजी करू नका विजय तुमचाच”, अल्पसंख्याक समाजातील महिलांची अर्चना पाटलांना ग्वाही
एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला नकली म्हणायचं. ज्यांनी फोडाफोडी केली. त्यांनीच कोण नकली आणि कोण असली म्हणायचंय. कोण नकली अन् कोण नकली हे भारताच्या व महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू द्या.जनतेने त्याचा निकाल हाती घेतला आहे. तो लवकरच मतपेटीतून आपल्या समोर येईल. असे म्हणत जयंत पाटील यांनी शाह यांना प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“शिरूर लोकसभेचा खरा नायक म्हणजेच शिवाजी आढळराव पाटील, त्यांनाच निवडून द्या,” अपुर्व पाटलांचं आवाहन
महाराष्ट्रात दोन पक्ष फोडले तरी देखील प्रतिसाद मिळत नाही म्हणूनच नकली आणि असली हे नवीन प्रकरण तयार करून लोकांच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आमहाराष्ट्रातील जनता फार हुशार आहे. जे फुटून गेलेले आङएथ. त्यांच्या विरोधात यंदाचा निकाल असेल याची खात्री आहे. अमित शाह यांना योग्य त्या व्यासपीठावरून योग्य वेळी आम्ही उत्तर देऊ. शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला काय दिलं. हे राज्यातील तरूणांना, महिलांना, सरकारी कर्मचाऱ्यांना व सगळ्यांनाच माहित आहे, म्हणून साहेबांना आज महाराष्ट्र मानतो. असेही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“धनंजय सावतांची मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनावर बोळवण,” अर्चना पाटलांना मोठा दिलासा ?
हेही वाचा…बड्या नेत्याने भाजपची साथ सोडली, माढ्यात वेगाने हालचाली सुरू
हेही वाचा…“ना भुजबळ, ना गोडसे, नाशिकच्या जागेसाठी महायुतीचा ‘हा’ नवा उमेदवार सज्ज “
हेही वाचा…“शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय दिले ? “नांदेडमध्ये अमित शाहांचा सवाल