अहमदनगर : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचा मेळावा काल जामखेडमध्ये पार पाडला. त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर राज्यातील मोठी जबाबदारी सोपवणार असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं आहे.
तुमचे कॅमरे पोहचले, मात्र पोलीस पोहचले नाहीत; थोरातांचा आघाडीला घरचा आहेर
रोहित पवार यांनी आपल्या कर्जत जामखेड मतदार संघात अनेक विकासक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल जयंत पाटिल म्हणाले की, रोहित पवार यांच्यासारखा महाराष्ट्रात कोणताच आमदार नियोजनबद्ध काम करीत नाही. त्यामुळे पक्षाचे काम वाढवण्यासाठी रोहित पवार यांना महाराष्ट्रात पाठवायचे आहे. कर्जत जामखेड तालुक्यात वेगाने विकास कामे होत आहेत. त्यामुळे या कामात मी त्यांच्या पाठीशी गंभीर पणे उभा आहे, असंही ते म्हणालेत.
गुलाल उधळूनही ‘मिठाचा खडा’ कुठे पडला? कालच्या प्रकारामुळे एसटी आंदोलन संपुष्टात येईल का?
यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचं विचार समजलं पाहिजे. हे विचार कार्यकर्त्यांमार्फत लोकांपर्यत पोहोचले पाहिजेत यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कर्जत जामखेडमध्ये पंचवीस वर्ष सुरू असलेली दहशत संपवली आहे. बाहेरून गुंड आणुन दहशतीचे राजकारण होत होते. मात्र हे राजकारण आम्ही मोडून काढले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता आली पाहिजे यासाठी जोमाने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
मीडियाला माहितं होतं, मग पोलिसांना का नव्हतं! अजित पवारांचा थेट गृहमंत्र्यांना सवाल
दरम्यान, आगामी काळात राज्यात महापालिका, विधानसभा आणि लोकसभेची निवडणुका होऊ घातली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष त्यादृष्टीने रणनिती आखत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष त्या हेतुने कार्यक्रम आखत आहे.
Read also:
- एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला! परिवहनमंत्र्यांनी दिला ‘हा’ कडक इशारा
- “आज एसटी कर्मचाऱ्यांचा मृतदेह आढळला? एक ना एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार”
- राजकीय वातावरण तापलं! पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची बैठक
- “माझी हत्या होऊ शकते”! न्यायालयात नेण्याआधी सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य
- भ्रष्टाचारावरून नेत्यांवर गरळ ओकणारे सोमय्या थेट ‘नॉट रिचेबल’; INS विक्रांत प्रकरण भोवणार