मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर काल अचानकपणे एसटी कर्मचारी आंदोलक असलेल्या काही लोकांनी हल्ला केला. त्यावेळी शरद पवार यांच्या बंगल्यासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्याठिकाणी अगोदर मीडिया पोहचलं होतं परंतु पोलीस वेळेवर पोहचले नाहीत, असा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षांतील काही नेत्यांनी केला. त्याच पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. आता या भेटीवरून भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
मीडियाला माहितं होतं, मग पोलिसांना का नव्हतं! अजित पवारांचा थेट गृहमंत्र्यांना सवाल
निलेश राणे म्हणाले की, एकही काच फुटली नाही किंवा घराचं नुकसान झालं नाही तरी राज्याचे गृहमंत्री आणि अॅडिसनल सीपी पवार साहेबांच्या घरी पोहचले. पोलीस अधिकारी घरात जाऊन तपासाबाबत माहिती देण्यासाठी पवार कुटुंबाने महाराष्ट्राला विकत घेतला आहे का? पवारांना इनामात ब्रिटिश सोडून गेले की महात्मा गांधी ? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.
काल गुलाल उधळण्यात आला, मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा उद्देश काय? अजित पवारांचा सवाल
आज परळ डेपो एक एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. याला जबाबदार कोण? शरद पवारांनी घराबाहेर येऊन एसटी कर्मचाऱ्यांना समजवण्याचा प्रयत्न का केला नाही? सुप्रिया सुळे म्हणत होत्या मी बसायला तयार आहे पण निघून गेल्या. एक ना एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार. त्याचबरोबर अजित पवार महाराष्ट्राचे आक्रमक नेते समजले जातात,, ते इतके आक्रमक आहेत की काल शरद पवारांच्या घराबाहेर भानगड झाली तरी मुंबईत येण्याची त्यांच्यात हिमंत नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे.
ते एसटी कर्मचारी नव्हतेच! 2000 रूपये देऊन आलेले भाडोत्री आंदोलक होते?
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना भडकावण्याप्रकरणी अॅड गुणरत्ने सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच सदावर्ते यांची १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलीस करीत आहे. तर न्यायालयात सदावर्ते यांची बाजू त्यांच्या पत्नी जयश्री पाटिल यांच्यासह तीन वकिल मांडत आहेत.
Read also:
- राजकीय वातावरण तापलं! पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची बैठक
- “माझी हत्या होऊ शकते”! न्यायालयात नेण्याआधी सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य
- भ्रष्टाचारावरून नेत्यांवर गरळ ओकणारे सोमय्या थेट ‘नॉट रिचेबल’; INS विक्रांत प्रकरण भोवणार
- तुमचे कॅमरे पोहचले, मात्र पोलीस पोहचले नाहीत; थोरातांचा आघाडीला घरचा आहेर
- गुलाल उधळूनही ‘मिठाचा खडा’ कुठे पडला? कालच्या प्रकारामुळे एसटी आंदोलन संपुष्टात येईल का?