मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या मागच्या सहा महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात भ्र्रष्टाचाराचे रान उठवत आहेत. किरीट सोमय्या यांनी वारंवार केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडीतील दिग्ग्ज नेते अडचणीत आले आहेत. संजय राऊत, यशवंत जाधव, अनिल परब, नवाब मलिक हे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांमुळे अडचणीत आलेले आहेत.
“जे आपण जन्मी करतो ते ह्याच जन्मी फेडावांच लागतं”; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला
किरीट सोमय्या वारंवार आरोप करत असल्यामुळे महाविकास आघाडीनेही त्यांच्या विरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केलीय. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत झालेल्या आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. या संदर्भात ट्रॉमबे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
“सदावर्तेनां अटक हे तर शरद पवारांचे कपटी कारस्थान “; सदावर्तेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
आमदार सुनील राऊत यांच्या उपस्थितीमध्ये माजी सैनिक भोसले नामक व्यक्तीने किरीट सोमय्या, पुत्र निल किरीट सोमय्या यांच्या वीरपद्धत कलम ४२०, ४०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता आज किरीट सोमय्या यांना पोलीस ठाण्यात चौकशी साठी समन्स बजाविण्यात आले होते.
लोकशाहीचा गळा चिरडून मारण्याचं काम; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
दरम्यान, समन्स आल्यानंतर किरीट सोमय्या चौकशीसाठी उपस्थित राहतील असं वाटत असताना ते आता नॉटरीचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. ते एका नियोजित कार्यक्रमासाठी दिल्लीत आहेत तर त्यांचे पुत्र निल हे खासगी कामासाठी बाहेर गेले असल्याने उपस्थित राहू शकत नाही असं त्यांच्या वकिलाने म्हटलं आहे. त्याचप्रमाणे या गुन्ह्यात जामिनासाठी त्यांनी अटकपूर्व जामीनाची मागणीही केली आहे. एरवी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून रान उठवणारे किरीट सोमय्या हे स्वतःवर आल्यावर थेट दिल्लीत गेल्याने उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.
Read also:
- तुमचे कॅमरे पोहचले, मात्र पोलीस पोहचले नाहीत; थोरातांचा आघाडीला घरचा आहेर
- गुलाल उधळूनही ‘मिठाचा खडा’ कुठे पडला? कालच्या प्रकारामुळे एसटी आंदोलन संपुष्टात येईल का?
- मीडियाला माहितं होतं, मग पोलिसांना का नव्हतं! अजित पवारांचा थेट गृहमंत्र्यांना सवाल
- काल गुलाल उधळण्यात आला, मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा उद्देश काय? अजित पवारांचा सवाल
- ते एसटी कर्मचारी नव्हतेच! 2000 रूपये देऊन आलेले भाडोत्री आंदोलक होते?