मुंबई : एसटीचं विलिनीकरण न करण्यामागे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच सुत्रधार असल्याचं सांगत आज एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येने शरद पवारांच्या बंगल्यावर त्यांनी दगडफेक आणि चप्पला फेकल्या. त्यामुळे त्याठिकाणी मोठ्या गोंधळ्याचं वातावरण तयार झालं. त्यावर आता राज्यातील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आंदोलनामागे काही अज्ञात व्यक्तींचा समावेश असल्याचं सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शरद पवारांच्या घरांवरील हल्ला ठरवून करण्यात आला; दोषींवर कारवाई होणार: गृहमंत्री
उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या घरावर झालेल्या हिंसक आंदोलनाचं समर्थन करत म्हणाले की, जे झालं ते बरोबरच झालं. ते करायलाचा पाहिजे होतं. अजून त्यावर दगडं मारायला पाहिजे, हा तर फार छोटा विचार झाला. कर्म असतं ना कर्म, जे आपण जन्म करतो. प्रत्येकजण हे लागू होतं. तुम्हाला आणि सगळ्यांना लागू होतं. यातून कोण वाचत नाही. जे आपण या जन्मी करतो ते ह्याच जन्मी आपल्याला कुठल्याना कुठल्या पद्धतीने फेडावं लागतं अजून काय बोलणार असा टोला देखील त्यांनी लगावला.
50 वर्षातील राजकारणाचा काय उपयोग? संन्यास घ्या; नितेश राणेंचा शरद पवारांवर निशाणा
शरद पवार साहेबांच्या घरावर आज काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. काल न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना, आज त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे पवार साहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते. महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या पवार साहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून,आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. अशी प्रतिक्रिया जयंत पाटिल यांनी म्हटलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या बंगल्यावर चपला अन् बांगड्या फेकल्या
दरम्यान, एसटी विलिनीकरणाच्या मुद्य़ावर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. न्यायालयाने दिलेला निर्णय अन्यायकारी असल्यानं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलिनीकरणार न होण्यामागचे सुत्रधार असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारने 124 एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
Read also:
- “सदावर्तेनां अटक हे तर शरद पवारांचे कपटी कारस्थान “; सदावर्तेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
- लोकशाहीचा गळा चिरडून मारण्याचं काम; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
- पवार साहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय? जयंत पाटलांचा सवाल
- ‘पॉलिटिकल महाराष्ट्र’ च्या वृत्ताला महापालिका आयुक्तांच्या निर्णयाने पुष्टी; अण्णा बनसोडे ‘पॉलिटिकल कॉर्नर’च!
- “अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण चिघळवत आहे”; राऊतांची एसटी आंदोलनावर प्रतिक्रिया