मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात एसटी आंदोलनाचा मुद्दा चांगलाचं पेटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असून आंदोलन कर्त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्याठिकाणी आंदोलन कर्त्यांनी त्यांच्या बंगल्यावर चप्पल आणि दगडफेक सुरू केली आहे. मोठ्या प्रमाणात ते आक्रमक झाले असून त्यांनी न्यायालायाच निर्णय मान्य झाल्याने त्यांनी हा आंदोलनचा पवित्रा घेतला आहे.
ज्यांची औकात नाही, त्यांना तुरूंगात टाका; अबु आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा
एसटी विलिनीकरणाच्या मुद्य़ावर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. न्यायालयाने दिलेला निर्णय अन्यायकारी असल्यानं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलिनीकरणार न होण्यामागचे सुत्रधार असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारने 124 एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
माझी राजकीय अथवा आत्महत्या झाली नाही; वसंत मोरे यांचा रूपाली पाटलांना प्रत्युत्तर
शरद पवार यांच्या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पल आणि दगडफेक केल्याने भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी काय उपयोग ? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगडी घेऊन आले. आयुष्भर घाणेरडं राजकारण केल्यावर काय परिणाम होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ. पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा. असं त्यांनी म्हटलं आहे.
16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला अन् डोळ्यात पाणी आलं! मनसे उपाध्यक्षांनी दिला राजीनामा
दरम्यान, काल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर येण्याचं आवाहन केलं होतं. तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नसल्याचंही त्यांनी काल स्पष्ट केले. पंरतु गुणरत्न सदावर्ते यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांना भडकावण्याचं काम केलं आणि त्यांनी शरद पवार यांच्या बंगल्यावर दगड फेक केली आहे. असा आरोप काही नेत्यांनी केला होता.
Read also:
- एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या बंगल्यावर चपला अन् बांगड्या फेकल्या
- “वसंत मोरेंचं पद गेल्यामुळे मनसेत फटाके वाजलेत अन् तात्या ढसाढसा रडले”
- “वसंत मोरेंचं पद गेल्यामुळे मनसेत फटाके वाजलेत अन् तात्या ढसाढसा रडले”
- कोल्हापूरात महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार; हसन मुश्रीफांचा विश्वास
- वसंत मोरेंच्या हकालपट्टीनंतर पुण्यात मनसेला गळती; पदधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांनी खळबळ