मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेल्या भाषणाचा परिणाम संपुर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे. पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. तर राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने वसंत मोरे यांचा शहराध्यक्ष पद देखील काढून घेण्यात आलं आहे. अशातच आता समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकर्वे राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? भाजप नेत्याचा राऊतांना सवाल
अबू आझमी म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार चालवण्यासाठी शरद पवार यांची महत्वाची भूमिका आहे. पंरतु राज्यात काही असे लोक आहेत ज्यांची औकात नाही आणि ते मुस्लिम धर्माला त्रास देत आहेत. सानपाडा येथे शिवसेनेचे लोक मशीद बांधण्यमध्ये आक्षेप घेत आहेत. या मुस्लिम बांधवाना सुरक्षा दिली पाहिजे. या राज्यात सेक्युलर सरकार आहे तिथे शिवसेनेचे कार्यकर्ते असा प्रकार करत आहेत. अंसही त्यांनी म्हटलं आहे.
वसंत मोरे, साईनाथ बाबर यांची चाय पे चर्चा! शहराध्यपदी निवड झाल्यानं केलं अभिनंदन
राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यासंबंधी भुमिकेवर बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे सारख्या नेत्याची काही औकात नाही. ज्यांचे आमदार नाही. ते मनाला वाटेल ते बोलतात. राज ठाकरे यांना अटक करून तुरूंगात टाकावे अशी मी शरद पवार यांच्याकडे मागणी केली आहे. लाऊडस्पीकरला राज्यात परवानगी आहे. मशिदीमध्ये फक्त 2 मिनिट अजाण होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी त्या सभेत जे काही बोललं. त्यावर करवाई व्हावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
“दादा..! जिथे कुठे असाल तिथून परत या ;” चंद्रकांत पाटलांच्या आठवणीत कोथरुडकरांची बॅनरबाजी
दरम्यान, राज ठाकरेंच्या वक्तव्यांमुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा परिणाम मनसेत देखील दिसून येत आहे. आज जवळपास मनसेच्या प्रमुख 4 नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात मनसे याबद्दल काय भूमिका घेणार ते आता पहाणं महत्वाचं ठऱणार आहे.
Read also:
- माझी राजकीय अथवा आत्महत्या झाली नाही; वसंत मोरे यांचा रूपाली पाटलांना प्रत्युत्तर
- 16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला अन् डोळ्यात पाणी आलं! मनसे उपाध्यक्षांनी दिला राजीनामा
- राष्ट्रवादीसह मुख्यमंत्र्यांचा देखील वसंत मोरेंना फोन! शिवसेनेत येण्याचं केलं आव्हान
- यशंवत जाधवांना आयकर विभागाचा झटका ! 40 मालमत्तांवरसह 26 फ्लॅट्सवरही जप्तीची कारवाई
- कोल्हापुरची निवडणुक सोपी समजून घोडचूक करू नका; चंद्रकांत पाटलांचा ‘मविआ’ इशारा