कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरेची पोटनिवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात कोल्हापूर उत्तरेच्या जागेवरून जोरदार संघर्ष बघायला मिळाला आहे. आता कोल्हापूरच्या या सत्ता संघर्षात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही बाजूंचे नेते सोडत नसल्याची प्रचिती कोल्हापूरकरांना आली असणार हे मात्र नक्की. चंद्रकांत पाटलांनी भाजपचाचा उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार असल्याचं म्हटलं आहे.
यशंवत जाधवांना आयकर विभागाचा झटका ! 40 मालमत्तांवरसह 26 फ्लॅट्सवरही जप्तीची कारवाई
अलिकडेच भाजपच्या काही नेत्यांकडूून महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं होतं. त्यावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, महिला उमेदवार असल्याने व्यक्तीगत टिका करणे विरोधकांना शोभत नाही. आपण शहराचा विकास कसा करणार यावर निवडणुका झाल्या पाहिजेत. पंरतु खालच्या स्तरावर प्रचार होत असल्याची टीका देखील त्यांनी भाजपवर केली आहे.
कोल्हापुरची निवडणुक सोपी समजून घोडचूक करू नका; चंद्रकांत पाटलांचा ‘मविआ’ इशारा
ते पुढे बोलताना म्हणाले की, कोल्हापुरचा विकास कसा होणार, हे व्हिजन घेऊन आम्ही निवडणुका लढणार आहोत. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार आहे, अशीही आशा त्यांनी व्यक्त केली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपकडून मुंबई, पुणे येथील कार्यकर्ते कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात उतरविण्यात आले आहेत. आमदार आशिष शेलार, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे शेवटच्या टप्प्यात कोल्हापूर उत्तरेत अत्यंत आक्रमकतेने प्रचार करत आहेत.
संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? भाजप नेत्याचा राऊतांना सवाल
दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना आज चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की तीन पक्ष जरी एकत्रित असले तरी कोल्हापूरच्या या राजकीय मैदानाला तुम्ही सोपी समजण्याची घोडचूक अजिबात करू नका. महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेली दादागिरी आणि मतदारांवर टाकलेला दबाव आम्ही अजिबात सहन करणार नाही असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. राजारामपुरी, दसरे गल्ली, कदमवाडी, बुधवारपेठ तालीम याठिकाणी भाजपकडून महिलांसाठी मेळावे घेण्यात आले ज्यांचे प्रतिनिधित्व चित्रा वाघ यांनी केले. सभेवर झालेल्या दगडफेकीवरून पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आणि पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे.
Read also:
- वसंत मोरेंच्या हकालपट्टीनंतर पुण्यात मनसेला गळती; पदधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांनी खळबळ
- ज्यांची औकात नाही, त्यांना तुरूंगात टाका; अबु आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा
- माझी राजकीय अथवा आत्महत्या झाली नाही; वसंत मोरे यांचा रूपाली पाटलांना प्रत्युत्तर
- 16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला अन् डोळ्यात पाणी आलं! मनसे उपाध्यक्षांनी दिला राजीनामा
- राष्ट्रवादीसह मुख्यमंत्र्यांचा देखील वसंत मोरेंना फोन! शिवसेनेत येण्याचं केलं आव्हान