मुंबई : एसटीचं विलिनीकरण न करण्यामागे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच सुत्रधार असल्याचं सांगत आज एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येने शरद पवारांच्या बंगल्यावर त्यांनी दगडफेक आणि चप्पला फेकल्या. त्यामुळे त्याठिकाणी मोठ्या गोंधळ्याचं वातावरण तयार झालं. त्यावर आता राज्यातील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आंदोलनामागे काही अज्ञात व्यक्तींचा समावेश असल्याचं सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटिल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“वसंत मोरेंचं पद गेल्यामुळे मनसेत फटाके वाजलेत अन् तात्या ढसाढसा रडले”
शरद पवार साहेबांच्या घरावर आज काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. काल न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना, आज त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे पवार साहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते. महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या पवार साहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असून, आम्ही याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. असंही ते म्हणाले.
वसंत मोरेंच्या हकालपट्टीनंतर पुण्यात मनसेला गळती; पदधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांनी खळबळ
पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते जे कोणी लोक असतील त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. संजय राऊत म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्व उपाय केले आहेत. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. तरीही काही तरी अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण चिघळवण्याचं, बिघडण्याचं काम करत आहेत. एका विशिष्ट गटाला चिथावणी देऊन, डोके भडकावून अशी कृत्य घडावीत यासाठी प्रयत्न सूरू आहे असा आरोप देखील यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.
कोल्हापूरात महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार; हसन मुश्रीफांचा विश्वास
दरम्यान, एसटी विलिनीकरणाच्या मुद्य़ावर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. न्यायालयाने दिलेला निर्णय अन्यायकारी असल्यानं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलिनीकरणार न होण्यामागचे सुत्रधार असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारने 124 एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
Read also:
- ‘पॉलिटिकल महाराष्ट्र’ च्या वृत्ताला महापालिका आयुक्तांच्या निर्णयाने पुष्टी; अण्णा बनसोडे ‘पॉलिटिकल कॉर्नर’च!
- “अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण चिघळवत आहे”; राऊतांची एसटी आंदोलनावर प्रतिक्रिया
- शरद पवारांच्या घरांवरील हल्ला ठरवून करण्यात आला; दोषींवर कारवाई होणार: गृहमंत्री
- 50 वर्षातील राजकारणाचा काय उपयोग? संन्यास घ्या; नितेश राणेंचा शरद पवारांवर निशाणा
- एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या बंगल्यावर चपला अन् बांगड्या फेकल्या