मुंबई : एसटीचं विलिनीकरण न करण्यामागे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच सुत्रधार असल्याचं सांगत आज एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येने आज एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या बंगल्यावर दगडफेक आणि चप्पला फेकल्या. त्यामुळे त्याठिकाणी मोठ्या गोंधळ्याचं वातावरण तयार झालं होतं. त्यावर आता राज्यातील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आंदोलनामागे काही अज्ञात व्यक्तींचा समावेश असल्याचं सांगितलं आहे.
वसंत मोरेंच्या हकालपट्टीनंतर पुण्यात मनसेला गळती; पदधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांनी खळबळ
एसटी कर्मचाऱ्यांनी ज्या प्रमाणे शरद पवारांच्या घरांवर दगडफेक आणि चप्पला फेकल्या आहेत. तो हल्ला काही लोकांकडून ठरवून करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे काही अज्ञात लोकांचा हात आहे. राज्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे यामध्ये जे कोणी दोषी आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई कऱण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. मुंबई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि संजय पांडे यांची देखील आम्ही चर्चा केली आहे. असंही ते म्हणाले.
ज्यांची औकात नाही, त्यांना तुरूंगात टाका; अबु आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा
एसटी विलिनीकरणाच्या मुद्य़ावर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. न्यायालयाने दिलेला निर्णय अन्यायकारी असल्यानं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलिनीकरणार न होण्यामागचे सुत्रधार असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारने 124 एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. शरद पवार यांच्या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पल आणि दगडफेक केल्याने भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी काय उपयोग ? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगडी घेऊन आले. आयुष्भर घाणेरडं राजकारण केल्यावर काय परिणाम होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ. पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा. असं त्यांनी म्हटलं आहे.
माझी राजकीय अथवा आत्महत्या झाली नाही; वसंत मोरे यांचा रूपाली पाटलांना प्रत्युत्तर
दरम्यान, काल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर येण्याचं आवाहन केलं होतं. तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नसल्याचंही त्यांनी काल स्पष्ट केले. पंरतु गुणरत्न सदावर्ते यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांना भडकावण्याचं काम केलं आणि त्यांनी शरद पवार यांच्या बंगल्यावर दगड फेक केली आहे. असा आरोप काही नेत्यांनी केला होता.
Read also:
- 50 वर्षातील राजकारणाचा काय उपयोग? संन्यास घ्या; नितेश राणेंचा शरद पवारांवर निशाणा
- एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या बंगल्यावर चपला अन् बांगड्या फेकल्या
- “वसंत मोरेंचं पद गेल्यामुळे मनसेत फटाके वाजलेत अन् तात्या ढसाढसा रडले”
- “वसंत मोरेंचं पद गेल्यामुळे मनसेत फटाके वाजलेत अन् तात्या ढसाढसा रडले”
- कोल्हापूरात महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार; हसन मुश्रीफांचा विश्वास