पुणे : गेल्या पाच महिन्यांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाच्या मागणीवरून मुंबईच्या आझाद मैदानासह संपूर्ण राज्यात बेमुदत संप पुकारला होता. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे एसटी महामंडळासहित जनतेलाही मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप शेवटी संपला आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी काल थेट राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या बंगल्यावर हल्ला केला. त्यानंतर राज्यात संतत्प प्रतिक्रिया उमटल्या. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
अजित पवार म्हणाले की, पोलीस विभाग त्यांचं काम करतील. अनेक वर्ष ते काम करत आहेत. परंतु त्यांची माथी भडकवण्यात आली. त्यामागे कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. मला आश्चर्य वाटत आहे दोन दिवसांपुर्वी आंदोलन यशस्वी झालं म्हणून गुलाल उधळण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा काय उद्देश होता, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
“अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण चिघळवत आहे”; राऊतांची एसटी आंदोलनावर प्रतिक्रिया
शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर एसटी कर्मचारी घुसले हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. तुम्हाला हे आधी का कळलं नाही. त्याठिकाणी जाणारे लोक मीडियाला घेऊन पोहचले. अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणं. मग मीडियाला जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही.
शरद पवारांच्या घरांवरील हल्ला ठरवून करण्यात आला; दोषींवर कारवाई होणार: गृहमंत्री
दरम्यान, आम्ही अनेकदा बैठका घेतल्या. परंतु नंतर ती लोकं संघटनांच देखील एकेनाशी झाली. त्यांनी तारतम्य सोडलं. जी भाषा वापरण्यात आली ती आपल्या संस्कृतीत बसत नाही. तुम्हालाही ती भाषा आवडणार नाही. पोलीस यंत्रणा याचा तपास करून यामागे कोण मास्टरमाईंट आहे याचा शोध घेतील, असंही ते म्हणालेत.
Read also:
- ते एसटी कर्मचारी नव्हतेच! 2000 रूपये देऊन आलेले भाडोत्री आंदोलक होते?
- “जे आपण जन्मी करतो ते ह्याच जन्मी फेडावांच लागतं”; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला
- “सदावर्तेनां अटक हे तर शरद पवारांचे कपटी कारस्थान “; सदावर्तेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
- लोकशाहीचा गळा चिरडून मारण्याचं काम; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
- पवार साहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय? जयंत पाटलांचा सवाल