मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर काल अचानकपणे एसटी कर्मचारी आंदोलक असलेल्या काही लोकांनी हल्ला केला. त्यावेळी शरद पवार यांच्या बंगल्यासमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्याठिकाणी अगोदर मीडिया पोहचलं होतं परंतु पोलीस वेळेवर पोहचले नाहीत, असा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षांतील काही नेत्यांनी केला. त्याच पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.
काल गुलाल उधळण्यात आला, मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा उद्देश काय? अजित पवारांचा सवाल
एसटी कर्मचाऱ्यांनी ज्या प्रमाणे शरद पवारांच्या घरांवर दगडफेक आणि चप्पला फेकल्या आहेत. तो हल्ला काही लोकांकडून ठरवून करण्यात आला आहे. या हल्ल्यामागे काही अज्ञात लोकांचा हात आहे. राज्यात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे यामध्ये जे कोणी दोषी आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई कऱण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
ते एसटी कर्मचारी नव्हतेच! 2000 रूपये देऊन आलेले भाडोत्री आंदोलक होते?
त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्या घरी जाऊन चौकशी केली आहे. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा येथील निवास स्थानी गेले. त्याठिकाणी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे देखील उपस्थित आहेत. शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या घरांभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
“जे आपण जन्मी करतो ते ह्याच जन्मी फेडावांच लागतं”; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना भडकावण्याप्रकरणी अॅड गुणरत्ने सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच सदावर्ते यांची १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलीस करीत आहे. तर न्यायालयात सदावर्ते यांची बाजू त्यांच्या पत्नी जयश्री पाटिल यांच्यासह तीन वकिल मांडत आहेत.
Read also:
- “माझी हत्या होऊ शकते”! न्यायालयात नेण्याआधी सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य
- भ्रष्टाचारावरून नेत्यांवर गरळ ओकणारे सोमय्या थेट ‘नॉट रिचेबल’; INS विक्रांत प्रकरण भोवणार
- तुमचे कॅमरे पोहचले, मात्र पोलीस पोहचले नाहीत; थोरातांचा आघाडीला घरचा आहेर
- गुलाल उधळूनही ‘मिठाचा खडा’ कुठे पडला? कालच्या प्रकारामुळे एसटी आंदोलन संपुष्टात येईल का?
- मीडियाला माहितं होतं, मग पोलिसांना का नव्हतं! अजित पवारांचा थेट गृहमंत्र्यांना सवाल