मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करत इतर पक्षाचा विचार करू असे म्हंटले होते.त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील जळगावच्या दौऱ्यावर येणार होते मात्र त्यांचा दौरा रद्द झाला आहे. त्या ऐवजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हेच मुंबईत बैठक घेणार होते ही बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत भाष्य केले आहे.
शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशावर चर्चा झाली का ? असं प्रश्न विचारण्यात आलं असता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नकार दिला. एकनाथ खडसेंबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं ते म्हणाले.
“एकनाथ खडसे यांच्याबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत बैठकीत चर्चा झाली,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली असल्याचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे. तसंच एकनाथ खडसेंच्या नाराजीबाबत त्यांच्या पक्षाने विचार करावा असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. सोबतच राजकारणात जर-तरला महत्त्व नसते असं सांगत एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाचं वृत्त फेटाळलं.
Read Also
'शिवसेनेनं करून दाखवलं मुंबईची तुंबई केली' – दरेकरांचा हल्लाबोल https://t.co/09wW9Wtz4v#PravinDarekar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 23, 2020