अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीसाठी दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार तर दुसरीकडे भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे असा असा सामना रंगणार आहे. 21 डिसेंबर रोजी कर्जत नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. कर्जत नगरपंचायतीवर सध्या भाजपची एक हाती सत्ता आहे. ही सत्ता राखण्यासाठी शिंदेंनी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर रोहित पवार यांनी भाजपचा गड भेदण्यासाठी जोरदार रणनिती आखल्याचं पाहायला मिळत आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव करुन मोठा धक्का देत भाजपच्या बालेकिल्लात प्रवेश केला. मात्र, आता रोहित पवारांची खरी कसोटी नगरपंचायतीच्या निवडणुकीत लागणार आहे. रोहित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. तर शिंदे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते सर्व ताकद लावून कामाला लागले आहेत. दरम्यान, या निवडणुकीत विजय आमचाच होणार, नगर पंचायतीच्या 17 पैकी 17 जागा आम्हीच जिंकणार, असा दावा रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसंच राजकिय हित आणि राजकारण करणाऱ्या लोकांच्या मागे लोक कधीही उभे राहत नाहीत, असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.
आम्हाला गाफील ठेऊन अजित पवारांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी आमचा गेम केला – गिरीश महाजन
दुसरीकडे राम शिंदे हे मागील 10 वर्ष या मतदारसंघाचे आमदार होते. तसेच भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होतेय. या काळात मतदारसंघात मी अनेक विकासाची कामे केली. मात्र, मागील दोन वर्षांपासून कुठलंही काम या मतदारसंघात झालं नाही, अशी टीका शिंदे यांनी रोहित पवारांवर केलीय. तसेच आपण केलेल्या कामाच्या जोरावर आणि लोकांच्या विश्वासावर जनता भाजपला बहुमत दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
कर्जत नगर पंचायतीत सध्याची स्थिती
भाजप :12
राष्ट्रवादी : 0
काँग्रेस : 4
शिवसेना : 0
अपक्ष : 1
एकूण सदस्य संख्या : 17
Read Also :
- दक्षिण अफ्रिकेतून एवढे लोक मुंबईत आले; आदित्य ठाकरेंनी सांगितला खळबळजनक आकडा
- सरकार पडणार असे म्हटलं तर कोणाच्या पोटात का दुखतं?; चंद्रकांत पाटलांचा पवारांना टोमणा
- हिवाळी अधिवेशनच्या तारखा निश्चित, लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश
- संसदेच्या अधिवेशनात गोंधळ: १२ खासदारांच निलबंन, शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश
- अनुदान सहाय्यतेत मोदी सरकारची महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक; सचिन सावंतांचा हल्लाबोल