मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून संवाद साधत राज्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर पंतप्रधांनी महाराष्ट्रातील परिस्थिती योग्यरित्या हातळल्यावरून राज्य सरकारचे कौतुक केल्याचा दावा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला होता. भाजप नेत्यांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले होते, यावरून आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर भाजप नेत्यांवर सडकून टीका केली आहे.
‘खट्याळ मुलं पण शांत होतात, पण यांचा थयथयाट थांबत नाही’, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित मुंबईतील कोविड मृत्यूंची नेमकी आकडेवारी लपवली जात असल्याचे म्हटले होते. यावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, आकडे लावण्यात आम्ही तरबेज नाही, आकडे लावण्याची पद्धत त्यांना लखलाभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे कौतुक केले आहे. तरी इतकी टीका कशासाठी? खट्याळ मुल देखील थयथयाट करून शांत बसते. तुम्ही टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वोच्च न्यायालयाला खोटे पाडत आहात. इतका थयथयाट कशासाठी?, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी फडणवीसांवर केली.
आदित्य ठाकरेंच्या कामाची उंची यांना सहन होत नाहीये. हे सहन न झाल्याने पोटदुखी फार वाढली आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीला फक्त खोटं म्हणायचं. मात्र लोक बघत आहेत, असा टोला देखील त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.
Read Also :
- ‘महाराष्ट्राची अवस्था पाहता पंतप्रधान कौतुक करण्याची सुतराम शक्यता नाही’
- कोरोना संकटात राजकारण! नितीन गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान
- ‘स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेतील कमतरता दूर करा’
- ‘सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज’
- ‘…त्यामुळेच मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कौतुक जगभरात होत आहे’