मुंबई : पंतप्रधान मोदींनी कोरोना परिस्थिती योग्यरित्या हातळल्यावरून महाराष्ट्र सरकारचे कौतुक केल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता या दाव्यानंतर ठाकरे सरकार आणि भाजप नेते आमने-सामने आले आहेत. मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता पंतप्रधान कौतुक करण्याची सुतराम शक्यता नाही, असे भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
केशव उपाध्ये म्हणाले की, स्वःताच उदोउदो करत फिरायच, आगा ना पिछा बोलत रहायचं, अपयश आल की केंद्रावर ठकलायच ही या राज्य सरकारची त्रिसूत्री, सर्वोच्च न्यायालयाची एक टिप्पणी कौतुक म्हणून मिरवायची आणि मुंबई हायकोर्ट जेव्हा म्हणते की जे नंदुरबारला जमले, ते मुंबईला का नाही? तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं!, अशी टीका त्यांनी ट्विट करत केली.
कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती?
आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं, सारखं पंतप्रधानानी यांच कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोय…३— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 9, 2021
कोरोना कमी झाला की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार आणि वाढला की जनतेचा निष्काळजीपणा! एकाच आयुष्यात सोंगं करायची तरी किती? आता घरीबसल्या मामाचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं, सारखं पंतप्रधानानी यांच कौतुक केले, याचा नवा खेळ खेळला जातोय, असा सणसणीत टोला देखील त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्राची आजची अवस्था पाहता ते कौतुक करतील, याची सुतराम शक्यता नाही आणि हे सांगतं कोण, तर मुख्यमंत्री कार्यालयाची प्रेसनोट! आता प्रत्येक बाबतीत PR agency वापरू नका, हेच तर देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या पत्रात म्हटले आहे, मग इतके झोंबले का?
वास्तव माहिती लपवून पंतप्रधानांकडून कौतुक केल्याचा दावा करताना मनाचा ‘आतला आवाज’ तरी मुख्यमंत्र्यांनी ऐकायला हवा, असा टोला देखील त्यांनी लगावला.
Read Also :
- कोरोना संकटात राजकारण! नितीन गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान
- ‘स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेतील कमतरता दूर करा’
- ‘सर्वोच्च न्यायालय व पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाचं व्हिटॅमिन घेऊन जबाबदारीने काम करणाऱ्यांची गरज’
- ‘…त्यामुळेच मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे कौतुक जगभरात होत आहे’
- ‘मी कडी लावून घरातच बसणार, तुम्ही मैदानात उतरा अशी ही मानसिकता’