नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी विरोधकांची इंडिया आघाडी जोरदार प्रयत्न करतांना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अयोध्येतील राम मंदिर हाच सर्वात मोठा निवडणुक मुद्दा असणार आहे. विरोधी पक्षांच्या जातनिहाय जनगणना व ओबीसी मतांच्या लढाईत भाजप हाच सर्वात योग्य मुद्दा मानतांना दिसत आहे. विद्यमान खासदारांपैकी यावेळी कोणाला तिकीट मिळेल, हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनातच खासदारांना सांगितले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…अजित पवारांची शरद पवारांसोबत भेट, अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय चर्चांना उधाण
अयोध्येतील राम मंदिर एकाच मुद्यावर भाजप लोकसभा निवडणुक लढवेल, गरिब कल्याण योजना, महिला आरक्षण, ओबीसींशी संबंधित योजनेसह इतर सर्व मुद्दे असले तरी सर्वात मोठा मुद्दा हा मंदिरच असणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. फेब्रुवारीमध्ये सार्वत्रित निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी त्यासाठी १ जानेवारी ते २२ जानेवारीपर्यंत संपूर्ण देशात राममय वातावरण तयार केले जाणार आहे.
हेही वाचा…“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून नसतील तर…,” अपक्ष आमदार बच्चू कडू यांचं मोठं विधान
दरम्यान, मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपला मतदान केले तर रामलल्ला दर्शनासाठी मोफत अयोध्यावारी घडवेन असे आमिष मतदारांना दिले जात आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता बदलली आहे का? देशातीलरामभक्तांसाठी मोफत अयोध्यावारी करून द्यावी, असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. तर रामलल्लेचे मोफत दर्शन घडविण्याचे आश्वासन देणाऱ्यांनी केंद्र सरकारमध्ये टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचे नवे खाते सुरू केले असावे, तुम्ही केलेल्या कामांवर निवडणूक लढवा. राम मंदिर दर्शनाचे आमिष का दाखवता असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जालन्यात आज ओबीसींचा एल्गार, सभेसाठी कोण कोणते नेते येणार ? यादी आली
हेही वाचा…ठरलं तर मग..! माधुरी दिक्षीत लोकसभा निवडणुक लढवणार? भाजपमध्ये प्रवेश करणार ?
हेही वाचा…बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर दोन्ही गटात राडा, ठाकरे अन् शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले
हेही वाचा…“फडणवीस साहेब साचेबंद बोलणं बंद करा, तेच चेहरे, तेच मोहरे..,” सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
हेही वाचा…“मराठा आंदोलनाची धग कायम, आमदार रत्नाकर गुट्टे यांचा कार्यक्रम मराठा तरूणांनी उधळून लावला”