पुणे : आपल्या खासदाराचं संसदेत पहिल्या दोन नंबरमध्ये नाव असून ९२ ते ९३ टक्के उपस्थिती आहे. लोकांचे प्रश्न सातत्याने मांडत असल्याने आपल्या खासदाराचं नाव वारंवार लोकांकडून घेतलं जातं. मग काही लोक सांगतात की भाषण करून काय उपयोग ? लोकसभा ही महाराष्ट्रातील लोकांचं दुखणं मांडण्यासाठी असते. ते मांडायचं असेल तर भाषण करावं लागतं. ते करण्याची भूमिका जर कोणी चांगली करत असेल तर त्याचे समर्थन करणे ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. असे म्हणत शरद पवार यांनी अजित पवार यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. काल पुण्याच्या दौंड तालुक्यातील महाविकास आघाडीचा भव्य शेतकरी मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, सुप्रिया सुळे यांना युनोमध्ये सुध्दा भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. अनेक संस्थांमध्ये काम करण्याची संधी आज त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे. हे काम करणारा व्यक्तिमत्व तुम्हा सगळ्यांकडे पुन्हा एकदा अधिक काम करण्यासाठी संधी मागतोय. युनोमध्ये सुद्धा भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली, अनेक संस्थांमध्ये काम करण्याची संधी आज त्यांना त्या ठिकाणी मिळत आहे. हे काम करणारा व्यक्तिमत्व तुम्हा सगळ्यांकडे पुन्हा एकदा अधिक काम करण्यासाठी संधी मागतोय. माझी सर्वांना तुम्हाला विनंती आहे की, त्यांची जी तुतारी घेतलेल्या माणसाची जी खूण आहे, त्यासमोर तुम्ही आपलं बटण दाबा आणि हे कर्तृत्ववान, जागरूक सभासद म्हणून तुम्हा सर्वांचं नावलौकिक वाढवण्याची जबाबदारी सुप्रियाला पुन्हा एकदा द्या. असेही पवारांनी आवाहन केलं आहे.
हेही वाचा…“इतका सच्चा, तत्वनिष्ठ, सज्जन, साधा, भोळा…” मनसेचं उद्धव ठाकरेंना खोचक पत्र
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आमचे जुने सहकारी वसंतराव धोंडे पाटील दुर्दैवाने ते हयात नाहीत. त्यांची आठवण मला झाली अनेक लोकांची नावे घेता येतील. अनेकांनी माझ्याबरोबर काम केलं. आता मला स्वतःला महाराष्ट्राच्या विधानसभेत, महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये जाऊन ५६ वर्ष झाली. आता खूप वर्ष लोकांच्यात काम केलं आहे. आता नव्या पिढीला संधी देणं, त्यांना प्रोत्साहित करणे आणि लोकांचे प्रश्न जे अत्यंत अवघड आहे ते सोडवण्यासाठी लक्ष घालणं एवढे एकच सूत्र मी माझ्या मनात ठेवलेले आहे. म्हणून नामदेव बापूंनी पाण्याचा प्रश्न सांगितला. आणखी काही प्रश्न मांडले ही निवडणुकीची प्रक्रिया संपू द्या, आपण एकत्र बसू आणि त्यातून मार्ग काढू, आज सरकार आपलं नाही तरी बारामतीकारांसाठी जे जे काही करता येईल ते केलं जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…माढा अन् सोलापुरचे भाजपचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार, फडणवीसांच्या नेतृत्वाखाली रॅलीचे आयोजन
हेही वाचा…‘मुळ पवार विरूद्ध बाहेरचे पवार’ ,अखेर शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
हेही वाचा…लहुजी शक्ति सेनेचा भाजपा-महायुतीला बिनशर्त पाठिंबा
हेही वाचा…रायगडमध्ये होणार मोठा घोळ, तीन ‘अनंत गिते’ निवडणुकीच्या रिंगणात
हेही वाचा…“महायुतीचा आपल्या हक्काचा खासदार असेल तर..,”मल्हार पाटलांचं मोठं विधान