मुंबई : मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद वर कायदा बनवण्यात आला असून आता त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटताना दिसत आहे. भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी एक पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात काही खुलासे करताना महाराष्ट्रातसुद्दा लव्ह जिहाद कायदा बनवण्यात यावा अशी मागणी केली आहे. याला आता महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.
लव्ह जिहाद हा केवळ भाजपचा अजेंडा आहे. भाजप यावरुन केवळ शब्दांचा खेळ करत आहे, अशी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरयांनी केली. लव्ह जिहाद कुठे झालाय हे आम्ही दाखवून देऊ. पण लग्न हा मुलगा-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. मात्र, भाजप यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रार्थनास्थळे उघडल्यामुळे कोरोना वाढला, या आपल्या वक्तव्याचा भाजपकडून विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. मी केवळ प्रार्थनास्थळे म्हटले नाही तर बारमध्ये जाण्यानेही कोरोना वाढला. लोक कोरोनाबाबत गंभीर नाहीत. मुंबईत दोन टक्के लोकांनी यावरुन राजकारण करण्याचा घाट घातल्याची टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.
Read Also :
आमदारकीसाठी पाठवलेल्या नावांवर राज्यपाल लवकरच निर्णय घेतील: छगन भुजबळ
कराची स्वीट्स; नितीन नांदगांवकर यांच्यावर संजय निरुपम यांची टीका, म्हणाले..
विरोधकांकडे लक्ष न देता महापालिका निवडणुकिसाठी अधिक जोमाने कामाला लागा -उद्धव ठाकरे
‘हे’ नागपूरला यायला घाबरतात, मग दिल्लीला काय जाणार? ; बावनकुळेंचा सरकारला टोला
देशाला विभागण्यासाठी भाजपकडून ‘लव्ह जिहाद’ शब्दाची निर्मिती, काँग्रेसची टीका