मुंबई : आरक्षण रद्द झाल्यानंत मराठा समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन करू नये म्हणून लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करत असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी दिला होता. तसेच, महाविकास आघाडी सरकारने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंधांमध्ये1 जूनपर्यंत वाढ केली आहे. सरकारच्या या निर्णयावर टीका होताना दिसत आहे. यातच आता विनायक मेटे यांनी सरकारवर आरोप केला आहे.
आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजामध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे, हा असंतोष रस्त्यावर दिसू नये, त्यांनी संघर्ष करू नये, मोर्चे काढू नये, आंदोलन करू नये म्हणूनच ठाकरे सरकारने लॉकडाऊन जाणीवपूर्वक वाढवला असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.
या सरकारच्या मनात पाप आहे. सर्वसामान्यांचा विचार न करता, त्यांच्या रोजीरोटीचा विचार न करता लॉकडाऊन वाढविण्यात आला असून, हा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Read Also :
- अक्षय तृतीयेदिवशी मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना गिफ्ट, जमा होणार किसान योजनेचा आठवा हप्ता
- ‘शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात आणि…’
- मराठा आरक्षण : ‘तातडीने ही फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार’
- मराठा आरक्षणावर केंद्राची पुनर्विचार याचिका, अशोक चव्हाण म्हणाले…
- मराठा आरक्षण प्रकरणावर केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल