नवी दिल्ली : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट दिले जाणार आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर किसान योजनेचा आठवा हप्ता जारी केला जाईल. पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकार दर आर्थिक वर्षात सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते.
आठव्या हप्त्यात देशातील एकूण 9.5 कोटी लाभार्थ्यांना एकूण 19,000 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली जाणार आहे. याबाबत आता माजी कृषीमंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी कल अक्षय तृतीय के शुभ अवसर पर 9.50 करोड किसानो के खाते मे PM – KISAN का हप्ता जमा करने वाले है। कोरोना के इस कठीण समय मे यह मदत किसानो लाभदायक होगी। मे किसान मोर्चा राष्ट्रीय महामंत्री नाते सभी किसानो के तरफ से स @narendramodi जी का आभार व्यक्त करता हू। pic.twitter.com/uldDV0F6q9
— Dr. Anil Bonde (@DoctorAnilBonde) May 13, 2021
अनिल बोंडे म्हणाले की, अक्षय तृतीयाच्या मुहर्तावर देशातील एकूण 9.5 कोटी लाभार्थ्यांना एकूण 19,000 हजार कोटी रुपयांची रक्कम वितरीत केला जाणार आहे. तर महाराष्ट्रातील 94 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1880 कोटी रुपये जमा होणार आहेत. कोरोना महामारीच्या या संकट काळात शेतकऱ्यांसाठी ही मदत महत्त्वाची आहे. याबाबत मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पंतप्रधान मोदींचे आभार मानतो, असे ते म्हणाले.
Read Also :
- ‘शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात आणि…’
- मराठा आरक्षण : ‘तातडीने ही फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार’
- मराठा आरक्षणावर केंद्राची पुनर्विचार याचिका, अशोक चव्हाण म्हणाले…
- मराठा आरक्षण प्रकरणावर केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल
- ग्लोबल टेंडरचा “घास” दाखवून, ठाकरे सरकारचा “फार्स” सुरु आहे