मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमनेसामने येणार आहेत. परंतु निवडणुकीच्या अगोदर दोन्ही बाजूंनी जागावाटपावरून मोठा खेळखंडोबा होणार आहे. यातच मागच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराच्या विरोधात निवडणुक लढविली, त्या उमेदवारासोबत महायुतीच्या उमेदवारांना लढवावी लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत देखील अशीच परिस्थिती बघायला मिळणार आहे. यातच आता जिंकेल त्याची जागा असा या नियमाप्रमाणे लोकसभेसाठी जागा वाटपाचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणं एवढं सोप्प नाही”, जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला
जिंकेल त्याची जागा या नियमानुसार महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक २१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर त्याच्याखालोखाल काॅंग्रेसला १५ ते १७ जागा, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला १० ते ११ जागा येण्याची शक्यता आहे. यात वंचित सोबत आल्यास त्याला १ तर राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा येण्याची चिन्हे आहेत. यातच मुंबईमध्ये ठाकरे गटाला चार जागा येण्याचा अंदाज आहे. यामध्ये दक्षिण मुंबई लोकसभा, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई तर काॅंग्रेस याठिकाणी उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईची जागा लढवू शकते.
हेही वाचा…“काँग्रेसचं ‘है तयार हम’ अभियान नेमकं कशासाठी?” भाजपने काॅंग्रेसला विचारले ‘हे’ पाच प्रश्न
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, कोल्हापुर, रत्नागिरी-सिंधूदूर्ग, रायगड, ठाणे, कल्याण-़ डोंबिवली, पालघर, नाशिक, शिर्डी, मावळ, धाराशीव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रामटेक, बुलढाणा, हिंगोली, वाशिम-यवतमाळ, हातकणंगले या जागांसाठी ठाकरे गट आग्रही आहे. तर काॅंग्रेसच्या वाट्याला नागपूर, भंडारा-गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, सोलापूर, सांगली, भिवंडी, उत्तर मध्य मुंबई, उत्तर मुंबई या जागेवर आपला उमेदवार देऊ शकतात.
दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाला बारामतीसह शिरूर, बीड, दिंडोरी, अहमदनगर, रावेर, माढा आणि सातारा तर वंचितच्या वाटेला अकोला जाण्याची शक्यता आहे. तर राजू शेट्टींना हातगणंकले जाऊ शकते. येत्या २९ तारखेला इंडिया आघाडीची जागावाटपाबाबत बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत आता यापैकी कोणत्या जागा कुणाला ? येणार ते पाहणं अतिशय महत्वाच ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा..एकनाथ शिंदे ‘ठाण्याचा वाघ’ तर देवेंद्र फडणवीस ‘फ्रायर ब्रॅण्ड’ नेते ; कुणी उधळली स्तुतीसुमने ?
हेही वाचा.पुण्यात कोयता गँगची दहशत कायम ; दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…काँग्रेस आज लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार, नागपुरात जाहीर सभा, ४५० जणांसाठी तीन भव्य व्यासपीठ
हेही वाचा...“काँग्रेस की रॅली है तय्यार है हम” ,लेकीन हम भी नही कुछ कम “, रामदास आठवलेंची खास कविता
हेही वाचा...“बच्चू कडू आघाडीत आले तर स्वागतच, शरद पवारांनी घेतली बच्चू कडूंची भेट,” राजकीय वर्तुळात चर्चा