नागपूर : काॅंग्रेसच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्रा काॅंग्रेसने नागपूरात भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. याठिकाणी काॅंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे उपस्थित राहणार आहे. जवळपास ४० एकरवर काॅंग्रेसची जाहीर सभा होत असून याठिकाणी काॅंग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. या सभेनंतर लगेचच १४ जानेवारीपासून काॅंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या मणिपूर ते मुंबई न्याय यात्रेला सुरूवात होणार आहे.
हेही वाचा…महायुतीतून कधी बाहेर पडणार ? बच्चू कडूंनी थेट स्पष्टच सांगितलं
काॅंग्रेसच्या नागपुरच्या सभेत राहुल गांधींसह देशातील प्रमुख नेते नागपुरात दाखल होणार आहेत. यामध्य विविध राज्यातील आजी माजी मुख्यमंत्री, राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी, सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तसेच पक्षाच्या विविध आघाड्यांचे सेल प्रमुख देखील उपस्थित राहणार आहेत. यातच जवळपास ४० एकरवर सभा होत असून मध्यभागी असलेल्या व्यासपीठावर सुमारे ५५ ते ६० नेते बसणार असून दोन्ही बाजूला सुमारे ४५० जणांची क्षमता असलेले दोन मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहेत.
हेही वाचा..“वय अन् वास्तव माहिती नसल्यामुळे ‘त्या’ अजितदादावर आरोप करताहेत”, शालिनीताई पाटलांना अजित पवार गटाचं प्रत्युत्तर
दरम्यान, नागपुरच्या सभेसाठी महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातून सुमारे चार ते पाच लाख नागरिक उपस्थित राहतील असा दावा आयोजन समितीचे सदस्य गिरीश पांडव यांनी केला आहे. तर आगामी निवडणुकांकरीता काॅंग्रेस जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे या सभेकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय.
READ ALSO :
हेही वाचा...“काँग्रेस की रॅली है तय्यार है हम” ,लेकीन हम भी नही कुछ कम “, रामदास आठवलेंची खास कविता
हेही वाचा...“बच्चू कडू आघाडीत आले तर स्वागतच, शरद पवारांनी घेतली बच्चू कडूंची भेट,” राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा.“अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडणं एवढं सोप्प नाही”, जयंत पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला
हेही वाचा“काँग्रेसचं ‘है तयार हम’ अभियान नेमकं कशासाठी?” भाजपने काॅंग्रेसला विचारले ‘हे’ पाच प्रश्न
हेही वाचा…“देशात कुणी अशी धडक मारली नसेल तशी मुंबईत धडक मारा”, जरांगे पाटलांनी मुंबईत जाण्याचा सांगितला मार्ग