पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर मागील काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीतील अनेक पक्ष आपल्याला मिळणाऱ्या जागांवर दावा सांगताना दिसत आहेत. यातच दिल्लीत उद्धव ठाकरे,शरद पवार आणि सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यात एक बैठक पार पडली. त्या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपापली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“त्या” किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरलं होतं”, जरांगे पाटलांनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी
प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार जागा मागत आहेत. संजय राऊत यांची २३ जागा शिवसेनेला मिळाव्यात, अशी इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर यांची १२ जागांची इच्छा आहे. शरद पवार गटाची सुद्धा काही इच्छा असेल. अशी गोळा बेरीज केली तर आकडा ४८ च्या वर जाईल. परंतु जिंकण्याची परिस्थिती कोणाची आहे, कोण जागा निवडून आणू शकतो? हेच जागा वाटपाचं समीकरण असणार आहे. असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“दादांसोबत नाही म्हणून आता सुप्रिया सुळेंना बारामतीत तळ ठोकावा लागतोय”, रूपाली चाकणकरांनी सुळेंना डिवचलं
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. बाकी त्यावर फक्त शिक्कामोर्तब राहिला आहे. मागच्या वेळी दिल्लीत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. फक्त याची घोषणा बाकी राहिली आहे. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत दिली आहे. तसेच इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची भूमिका असेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाबाबात प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले की, येत्या एक दोन दिवसांत जागावाटपाचं चित्र सर्वांसमोर स्पष्ट केलं जाईल. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांची दिल्लीत एक बैठक झाली आहे. काॅंग्रेसच्या पक्षांतर्गत काही बैठका दिल्लीत पार पडल्याची माहिती माझ्या कानावर आलीय. तिन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र बसतील आणि या आठवड्याभरात सर्व गोष्टी ठरतील अशी मला अपेक्षा आहे. असं जयंत पाटलांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉम्युला ठरला का ? जयंत पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…
हेही वाचा..ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं..! ‘या’ लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार
हेही वाचा…मिरजेत ठाकरे अन् शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांत भिडले, शिवसेना कार्यालयावरून मोठा राडा
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली,” सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर जहरी टिका
हेही वाचा..“एक दुसऱ्याच्या मानेवर बसण्याची गद्दारांची सुरूवात झालीय”, जागावाटपावरून महायुतीत कलह, ठाकरे गटाची जोरदार टिका