पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. बाकी त्यावर फक्त शिक्कामोर्तब राहिला आहे. मागच्या वेळी दिल्लीत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. फक्त याची घोषणा बाकी राहिली आहे. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत दिली आहे. तसेच इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची भूमिका असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. यातच आता जयंत पाटलांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा..“दादांसोबत नाही म्हणून आता सुप्रिया सुळेंना बारामतीत तळ ठोकावा लागतोय”, रूपाली चाकणकरांनी सुळेंना डिवचलं
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलाबाबात प्रश्न विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले की, येत्या एक दोन दिवसांत जागावाटपाचं चित्र सर्वांसमोर स्पष्ट केलं जाईल. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांची दिल्लीत एक बैठक झाली आहे. काॅंग्रेसच्या पक्षांतर्गत काही बैठका दिल्लीत पार पडल्याची माहिती माझ्या कानावर आलीय. तिन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र बसतील आणि या आठवड्याभरात सर्व गोष्टी ठरतील अशी मला अपेक्षा आहे. असं जयंत पाटलांनी म्हटलं.
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त संगीतमय भव्य भजन स्पर्धा ; पुणेकरांना अनुभवायला मिळणार ‘याची देही याची डोळा’
दरम्यान, यातच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून ठाकरे गटाने २३ जागांवर दावा सांगितला आहे. तर काॅंग्रेस १५ आणि शरद पवार गटाला १० जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातच वंचित बहुजन आघाडी सोबत आली तर वंचित आणि राजू शेट्टी यांना प्रत्येकी एक एक जागा सोडण्याची शक्यता आहे. याठिकाणी मग काॅंग्रेसला १६ जागा शरद पवार गटाला १० तर ठाकरे गटाला २० जागा मिळण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा..ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं..! ‘या’ लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार
हेही वाचा…मिरजेत ठाकरे अन् शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांत भिडले, शिवसेना कार्यालयावरून मोठा राडा
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली,” सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर जहरी टिका
हेही वाचा..“एक दुसऱ्याच्या मानेवर बसण्याची गद्दारांची सुरूवात झालीय”, जागावाटपावरून महायुतीत कलह, ठाकरे गटाची जोरदार टिका
हेही वाचा…“त्या” किंकाळ्या इतक्या होत्या की गाव हादरलं होतं”, जरांगे पाटलांनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी