मुंबई : आता दहा महिने बारामतीत आणि पुरंदर मतदारसंघात राहणार असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. त्यावर आता अजित पवार गटाकडून जोरदार टिका करण्यात येत आहे. यातच अजिदादा सोबत नाही म्हणून तुम्हाला १० महिने बारामतीमध्ये तळ ठोकून बसावं लागणार असा जोरदार टोला अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.
हेही वाचा…महायुतीत जागांचा पेच वाढला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ‘या’ जागांवर दावा सांगितला
आता अजिदादांवर बोलणाऱ्या दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत. विकासाचं राजकारण हवं आहे. दादासोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागतोय. सुप्रिया ताई गेली १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत. आता दादासोबत नाहीत म्हणून तुम्हाला १० महिने बारामतीमध्ये तळ ठोकून बसावं लागणार आहे. अशी टिका करत अजित पवार असताना तुम्हाला निवडणुकीच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी बारामतीत जावं लागतं होतं. पण आता तसं दिसत नाही असाही टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा…आगामी निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्राचा वापर ; फडणवीसांनी नेत्यांना दिली ‘ही’ तंबी
दरम्यान, पुढे बोलतांना रूपाली चाकणकर म्हणाल्या की, दादांना मुख्यमंत्री करायचंय. भावनिक राजकारण जास्त वेळ चालत नाही. निवडणुका काहीच दिवसांवर आहेत. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती विजयी होईल. अजिदादांना मुख्यमंत्री होतांना पाहायचं असेल तर आम्हाला काम करावं लागेल. दादांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं, हे आमचं स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. दादा मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांची इच्छा असल्याचं रूपाली चाकणकर यांनी म्हटल.
READ ALSO :
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त संगीतमय भव्य भजन स्पर्धा ; पुणेकरांना अनुभवायला मिळणार ‘याची देही याची डोळा’
हेही वाचा…हे तीन चेहरे डोक्यात साठवून ठेवा.! IIT BHU मधील सामूहिक ब’ला’त्का’र प्रकरण, तिन्ही आरोपी भाजपा आयटी सेलचे सदस्य
हेही वाचा.रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवर भाजपचा डोळा ; भाजप ‘या’ कॅबिनेट मंत्र्याला मैदानात उतरवण्याच्या तयारीत
हेही वाचा..राष्ट्रवादीतल्या सासऱ्यावर भाजपमधील सून भारी पडणार का? ; ‘या’ लोकसभा मतदारसंघात निवडणूक गाजणार
हेही वाचा..“पुर्वी मंबाजी, तुंबाजी होते, आताच्या काळात मिटकरी आहेत”, शरद पवार गटाने मिटकरींना डिवचलं