मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मोठी रणनिती आखली आहे. यातच पक्षातून उमेवारी मिळावी म्हणून काही नेत्यांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात येत आहे. यातच भाजप नेत्यासाठी नाही, तर पक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढणार असून उमेदवार निवडीतही प्रस्थापितांसाठी धक्कातंत्र वापरले जाण्याचे संकेत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा…सुनील केदारांचा पाय आणखी खोलात ; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, कोर्टात झालेल्या सुनावणीत काय झालं?
उमेदवारीसाठी इच्छुकांनी दबावतंत्र वापरल्यास त्यांचा विचार करणार नसल्याची तंबी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांना दिलीय. तर उमेदवार जाहीर होण्याची वाट न पाहता ३१ जानेवारीपर्यंत लोकसभा तर १४ फेब्रुवारीपर्यंत विधानसभानिहाय भाजपची निवडणूक कार्यालये सुरू करण्याचे आदेश सहराष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांनी दिले आहेत.
हेही वाचा..संजोग वाघेरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश ; अन् खासदार बारणे अन् राहुल कलाटे यांची झाली ‘राजकीय कोंडी’
दरम्यान, भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून उमेदवारीसाठी कोणत्याही नेत्याने पक्षाला गृहीत धरू नये. निवडून येण्याची क्षमता व अन्य बाबीपाहून उमेदवारीबाबत संसदीय मंडळाकडून निर्णय घेतला जाईल. फलकबाजी किंवा अन्य माध्यमातून दबाव आणणाऱ्यांना उमेदवारी मिळणार नाही. असा इशारा फडणवीसांनी दिलाय. यातच मध्यप्रदेश, राजस्थान आणि त्याआधी गुजरात व अन्य राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपने प्रस्थापित नेत्यांना धक्का दिला आहे. आमदारांना उमेदवारी नाकारली. शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे यांच्यासह मातब्बर नेत्यांना मुख्यमंत्रीपद न देता नवीन चेहऱ्यांचा विचार झाला. त्याचधर्तीवर लोकसभा निवडणुकीतही उमेदवारी देण्याचे धोरण पक्ष राबविणार असल्याचे संकेत वरिष्ठांनी दिले.
READ ALSO :
हेही वाचा“मुथरेत श्रीकृष्ण मंदिर उभारावं,” नितेश राणेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी
हेही वाचा..“नववर्ष मावळतांना मावळची जागा आपली पाहिजे”, मावळ लोकसभेसाठी ठाकरे गटाचा नेता ठरला ?
हेही वाचा..आदित्य ठाकरेंचा कोल्हापुर दौरा, ‘या’ दोन ठिकाणी ठाकरेंची तोफ धडाडणार
हेही वाचा…“महाराष्ट्रातला युवा आता थंड बसणार नाय,”आणखी एक प्रकल्प गुजरातला पळवला, पवारांची सरकारवर जोरदार टिका
हेही वाचा…खासदार अमोल कोल्हेंची ‘क्रेझ’ ओसरली? शेतकरी आक्रोश मोर्चाला प्रतिसाद मिळेना!