मुंबई : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी शहाराध्यक्ष आणि माजी महौपार संजोग वाघेरे-पाटील यांनी आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजोग वाघेरे यांच्या हाताला शिवबंधन बांधून त्यांनी पक्षात स्वागत केलं आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांनी शिंदे गट आणि अजित पवार गटावर जोरदार टिका केली.
हेही वाचा…महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरात सरकारने पळवला ; काॅंग्रेसची सरकारवर जोरदार टिका
मागच्या काळात मुख्यमंत्री असतांना उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात अत्यंत महत्वाचं काम केलं होतं. त्यावेळेचं काम पाहून मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत भावूक झालो होतो. तसेच संजय राऊत हे दरदिवशी मीडियाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम करत आहेत. तसेच ठाकरे गटाने मागच्या काळात अनेक महत्वाची काम केली आहे. त्यामुळेच माझ्या कार्यकर्त्यांच्या मनात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करायचं असं ठरलं आणि त्यांची भेट घेतली. त्यानंतर आज हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. तसेच जी जबाबदारी माझ्यावर देण्यात येईल. ती पार पाडेन असं संजोग वाघेरे यांनी मातोश्रीवर बोलतांना सांगितलं.
हेही वाचा…मग बाबरीचा ढाचा त्यांच्या वजनाने पडला असेल”, उद्धव ठाकरेंची फडणवीसांना कोपरखळी
पन्नास खोके आणि र्स्कोपिओ बॉलेरो यांना लाथाडून संजोग वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात आलेले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधनात बांधून परिवारात सामावून घेतलं आहे. आम्ही प्रत्येक वेळी शिवसेनेत भावूक होतो. यातच आता संजोग वाघेरे यांना मावळाची जबाबदारी पुन्हा शिवसेनेकडे खेचून आणायची आहे. नववर्ष मावळतांना पुन्हा मावळ आपल्याकडे उजेडात आणायचं आहे. असं खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…मोदींनी लोकसभा निवडणुकीचं बिगूल अयोध्यात वाजवलं ; हजारो कोटींच्या कामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन
मातोश्रीत आलेल्या सर्व शिवसेनेच्या वाघांनो तुमचं मातोश्री आणि शिवसेनेत स्वागत करतो आहे. असा काळ आहे की आता भावूक आणि घाऊक असा फरक कळायला लागला आहे. जे भावूक आहेत ते निष्ठेने शिवसेनेसोबत आहेत. परंतु जे घाऊक आहेत त्यांना खोक्यांमध्ये बांधून ठेवण्याची गरज आहे. सुरूवातीपासून मावळ मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. गद्दार आणि स्वाभिमानी यातला फरक संजोग वाघेरे यांच्यामध्ये आहे. आज शिवसेनेकडे काहीच नाही. परंतु सत्ताधाऱ्यांनी सत्ता हिसकावून घेतली आणि गद्दारी केली. परंतु सत्ताधारी पक्षाकडे गर्दीचा ओघ असतो, परंतु सत्ता नसतांना सत्ता आणण्याच्या जिद्दीने आपण आला आहात. अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या श्रीरंग बारणे खासदार असून ते शिंदे गटात दाखल झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळवर श्रीरंग बारणे यांनी पुन्हा उमेदवारी सांगितली आहे. तर भाजपकडून बाळा भेगडे इच्छूक आहेत. यातच आता अजित पवारांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने त्यांना आता मावळातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा..आदित्य ठाकरेंचा कोल्हापुर दौरा, ‘या’ दोन ठिकाणी ठाकरेंची तोफ धडाडणार
हेही वाचा…“महाराष्ट्रातला युवा आता थंड बसणार नाय,”आणखी एक प्रकल्प गुजरातला पळवला, पवारांची सरकारवर जोरदार टिका
हेही वाचा…खासदार अमोल कोल्हेंची ‘क्रेझ’ ओसरली? शेतकरी आक्रोश मोर्चाला प्रतिसाद मिळेना!
हेही वाचा…सुनील केदारांचा पाय आणखी खोलात ; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, कोर्टात झालेल्या सुनावणीत काय झालं?
हेही वाचा..संजोग वाघेरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश ; अन् खासदार बारणे अन् राहुल कलाटे यांची झाली ‘राजकीय कोंडी’