पुणे । विशेष प्रतिनिधी राज्यातील सत्ता बदलानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाची राज्य प्रचारकपदाची धुरा हाती घेतलेले शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना उबाठा यासह सर्वच भाजपाविरोधी पक्ष-संघटना यांना साद घालत, ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ चे नियोजन केले. मात्र, या मोर्चाला सर्वसामान्य नागरिक, ग्रामीण भागातील शेतकरी यांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे केवळ सोशल मीडियावरील ‘आक्रोश’ अशीच स्थिती पहायला मिळत आहे.
हेही वाचा…“देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला फुशारक्या मारू नये,” उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर जोरदार घणाघात
देशात छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मणिपूर अशा पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे जोरदार मुसंडी मारली. तीन राज्यात भाजपा सत्तेत विराजमान झाले. तेलंगणाचा वगळता काँग्रेससह इंडिया आघाडीचा धुव्वा उडाला. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील होईल, अशी भिती महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीला सतावू लागली आहे. त्याचा सर्वाधिक फटका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे. मध्यंतरी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. त्याला प्रतिसाद मिळाला. त्याचा परिणाम कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झाला, असा अभ्यास करीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी संघर्ष यात्रा सुरू केली होती. त्यानंतर लगेचच खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेत ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ सुरू केला.
हेही वाचा..शिवसेनेच्या सर्व वाघांनो तुमचं मातोश्री स्वागत ; अजित पवारांचा खंदा समर्थक ठाकरे गटात सामील
डॉ. अमोल कोल्हे यांनी २०१९ मध्ये निवडून आल्यानंतर मतदार संघामध्ये लक्ष दिले नाही. तळागाळातील नागरिकांशी संपर्क ठेवला नाही, अशी टीका राष्ट्रवादीतील फुटीपूर्वीच स्वपक्षातील नेते करीत होते. अभिनेता असलेले अमोल कोल्हे राजकारण आणि अभिनय यामध्ये पुरते ‘बिझी’ होते. परिणामी, लोकांमधून नकारात्मक सूर येवू लागला होता. त्याचा फायदा माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि अन्य विरोधकांनी उचलण्यास सुरूवात केली. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ मधील नथूराम गोडसे यांचा अभिनय, चित्रपट प्रमोशनच्या निमित्ताने भाजपाचे नेते, गृहमंत्री अमित शाह यांची भेट, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला लावलेली हजेरी…अशा अनेक कारणांमुळे डॉ. कोल्हे यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
अभिनेता असलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्या दिमतीला सोशल मीडिया चालवणारी मोठी यंत्रणा आहे. त्याचा वापर करीत शेतकरी आक्रोश मोर्चाचे सोशल ब्रँडिग करण्यात येत आहे. किल्ले शिवनेरी येथून सुरू झालेला मोर्चा दि. ३० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे समारोप होणार आहे. पण, मोर्चाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार ब्रँडिंग करण्यात येत आहेत. त्यामुळे डॉ. कोल्हे यांचा लोकसभा निवडणूक विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागेल, असे चित्र आहे.
शेतकरी, कष्टकऱ्यांनी फिरवली पाठ…
दरम्यान, पुण्यात झालेल्या एका बैठकीमध्ये शरद पवार यांनीच डॉ. कोल्हे शिरुर मतदार संघातील २०२४ मध्ये उमेदवार राहतील, अशी घोषणा केली होती. त्यानंतर काहीच दिवसांत डॉ. कोल्हे यांना राष्ट्रवादीचे राज्य प्रचारक अर्थात सेलिब्रेटी प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मतदार संघातील वाढता विरोध पाहून छत्रपती संभाजी महाराज यांच्या अभिनयामुळे सुप्रसिद्ध असेलेले डॉ. कोल्हे यांना राज्यभरात प्रचारासाठी मैदानात उतरवण्याची रणनिती आखण्यात आली. मात्र, शेतकरी आक्रोश मोर्चाकडे सर्वसामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सुनील केदारांचा पाय आणखी खोलात ; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला, कोर्टात झालेल्या सुनावणीत काय झालं?
हेही वाचा..संजोग वाघेरेंचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश ; अन् खासदार बारणे अन् राहुल कलाटे यांची झाली ‘राजकीय कोंडी’
हेही वाचामहाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरात सरकारने पळवला ; काॅंग्रेसची सरकारवर जोरदार टिका
हेही वाचा“मग बाबरीचा ढाचा त्यांच्या वजनाने पडला असेल”, उद्धव ठाकरेंची फडणवीसांना कोपरखळी
हेही वाचा…मोदींनी लोकसभा निवडणुकीचं बिगूल अयोध्यात वाजवलं ; हजारो कोटींच्या कामांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन