मुंबई : काॅंग्रेसची सत्ता गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट 2014 साली आली. त्यानंतर पुढच्या लोकसभा निवडणुकीत देखील मोदी लाट चालली आणि नरेंद्र मोदी देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. परंतु सत्ता मिळवण्यासाठी भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला. याचाच आधार घेऊन अनेक पक्षातील राजकीय नेते देखील भाजपने फोडले असल्याचा आरोप त्यांच्यावर होऊ लागला. यावरून आता शिवसेनेच्या नेत्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी त्यांच्यावर खोचक टिका केली आहे.
“मला कुत्रा निशाणी दिली तरी निवडून येईन, माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको”; अब्दुल सत्तार
देशात एव्हाना महाराष्ट्रात देखील विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये गेले. सुरूवातीच्या काळात भाजपने त्यांच्यावर भ्रष्टाचारप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात विविध योजना राबिवल्या. त्यातीलच एक आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मोदींनी पुढे आणली. त्यावरूनच मोदींनी आता भाजपला पण आत्मनिर्भर बनवावे, किती दिवस दुसऱ्या पक्षाची माणसे घेऊन पक्ष चालवणार, अशी खोचक टिप्पणी मनिषा कायंदे यांनी केली आहे.
“जर RSS वर बंदी घालण्याची मागणी होत असेल तर…;”सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार असताना भाजपने भ्रष्टाचार प्रकऱणी आक्रमक भूमिका घेतली. भाजपच्या अनेक नेत्यांनी गंभीर आरोप देखील केलेत. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून भाजपसोबत युतीत सरकार स्थापन केले. तशापासून भाजपचे नेते गप्प झालेत. ज्या ज्या नेत्यांवर भाजपच्या नेत्यांनी आरोप केले होते. ते सर्व नेते शिंदे गटात सामील झालेत.
Read also
- “सत्य, परखड बोलणारे भाजपचे एकमेव नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी”; रूपाली पाटील
- “प्रभू रामाच्या शिकवणीवर राहुल गांधी यांची पदयात्रा सुरूय”
- “एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरेंचे सगळे आजार गायब झालेत”; संदीपान भुमरेंची फटकेबाजी
- मोदींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहचविण्याचे गिरीश खत्रींचं काम ; मोहोळ
- सरनाईकांवर जनहित याचिका दाखल..! दफन भूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडप केल्याचा आरोप