पुणे : राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार टिका टिप्पणी सुरू आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. महागाई, बेरोजगारी इत्यादींमुळे सर्वसामान्या जनता त्रस्त झाली आहे. त्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“जर RSS वर बंदी घालण्याची मागणी होत असेल तर…;”सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आणि समृद्ध देश असूनही येथील लोकसंख्या गरीबी, उपासमार, बेरोजगारी, जातिवाद, अस्पृश्यता आणि महागाईचा सामना करीत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी म्हटलं होतं. नागपुरात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. तसंच देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत चालली आहे. ती भरून काढण्याची गरज आहे. तसेच भारत हा गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. असंही ते म्हणाले.
“शाळेत महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन झालेच पाहिजे”; छगन भुजबळांचा आग्रह
नागपुर येथे झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्याबाबत आपलं परखड मत व्यक्त केलं. त्यानंतर सत्य, परखड बोलणारे भाजपचे एकमेव नेतृत्व म्हणजे नितीन गडकरी असं म्हणत रूपाली पाटील यांनी गडकरींचं कौतुक केलं आहे. केंद्रातील सर्वात लोकप्रिय नेतृत्व आणि सगळ्या राजकीय पक्षांची जवळीक असणाऱ्या व्यक्तिमत्वामध्ये नितीन गडकरी यांचं नाव घेतलं जातं.
Read also
- “प्रभू रामाच्या शिकवणीवर राहुल गांधी यांची पदयात्रा सुरूय”
- “एकनाथ शिंदेंमुळे उद्धव ठाकरेंचे सगळे आजार गायब झालेत”; संदीपान भुमरेंची फटकेबाजी
- मोदींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश तळागाळापर्यंत पोहचविण्याचे गिरीश खत्रींचं काम ; मोहोळ
- सरनाईकांवर जनहित याचिका दाखल..! दफन भूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडप केल्याचा आरोप
- “मला कुत्रा निशाणी दिली तरी निवडून येईन, माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको”; अब्दुल सत्तार