पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. बाकी त्यावर फक्त शिक्कामोर्तब राहिला आहे. मागच्या वेळी दिल्लीत शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. फक्त याची घोषणा बाकी राहिली आहे. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी इंडिया आघाडीच्या जागावाटपाबाबत दिली आहे. तसेच इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यांची महत्वाची भूमिका असेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…आगामी निवडणुकीत भाजपकडून धक्कातंत्राचा वापर ; फडणवीसांनी नेत्यांना दिली ‘ही’ तंबी
मागील काही वर्षापासून विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र मागे पडत चालला आहे. राज्यात जरी खोके सरकारचे २०० आमदार असतील परंतु विकास वेगाने होतांना दिसत नाही. यातच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पाण्याचा प्रश्न झाला आहे. त्यामुळे पाणी अतिदृष्टी आणि महागाईचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यामुळे सरकारने सर्व जातीचं राजकारण बाजूला ठेऊन याकडे लक्ष देण्याची गरज आहे. असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
हेही वाचा..“मुथरेत श्रीकृष्ण मंदिर उभारावं,” नितेश राणेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे मागणी
दरम्यान, यातच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून ठाकरे गटाने २३ जागांवर दावा सांगितला आहे. तर काॅंग्रेस १५ आणि शरद पवार गटाला १० जागा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. यातच वंचित बहुजन आघाडी सोबत आली तर वंचित आणि राजू शेट्टी यांना प्रत्येकी एक एक जागा सोडण्याची शक्यता आहे. याठिकाणी मग काॅंग्रेसला १६ जागा शरद पवार गटाला १० तर ठाकरे गटाला २० जागा मिळण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…हे तीन चेहरे डोक्यात साठवून ठेवा.! IIT BHU मधील सामूहिक ब’ला’त्का’र प्रकरण, तिन्ही आरोपी भाजपा आयटी सेलचे सदस्य
हेही वाचा.रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभेवर भाजपचा डोळा ; भाजप ‘या’ कॅबिनेट मंत्र्याला मैदानात उतरवण्याच्या तयारीत
हेही वाचा..राष्ट्रवादीतल्या सासऱ्यावर भाजपमधील सून भारी पडणार का? ; ‘या’ लोकसभा मतदारसंघात निवडणूक गाजणार
हेही वाचा..“पुर्वी मंबाजी, तुंबाजी होते, आताच्या काळात मिटकरी आहेत”, शरद पवार गटाने मिटकरींना डिवचलं
हेही वाचा…महायुतीत जागांचा पेच वाढला, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ‘या’ जागांवर दावा सांगितला