मावळ : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल रात्री उशीरा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे. काल रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्ससोबत बैठक झाली त्यानंतर बैलगाडा शर्यत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर राज्यात प्रथमच तळेगाव एमआयडीसीजवळ नाणोली तर्फे चाकण येथे नववर्षदिनी आयोजित करण्यात आलेली बैलगाडा शर्यत स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी शुक्रवारी रात्री दिली.
आज मध्यरात्रीपासून राज्यात कठोर निर्बंध; ‘अशी’ असणार नवीन नियमावली
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जारी केलेल्या निर्बंधांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या विनंतीनुसार ही शर्यत स्थगित करण्यात आल्याचे शेळके यांनी सांगितले. बैलगाडा शर्यतींबरोबरच आपल्याला प्रत्येक जीव महत्वाचा आहे, असे शेळके यांनी स्पष्ट केले.
‘राजन तेली यांची मोठी मेहनत, खचू नका, जोमानं कामाला लागा‘, फडणवीसांचा सल्ला
सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत येत्या शनिवारी (एक जानेवारी) तळेगाव दाभाडे एमआयडीसीजवळ नाणोली तर्फे चाकण येथे होणार होती. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैलगाडा शर्यतीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सशर्त परवानगी दिली होती. त्यामुळे नाणोलीच्या दत्त जयंती उत्सवात तब्बल आठ वर्षांनी बैलगाडे धावणार होती. अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन होत असल्याने बैलगाडा मालक व शौकिनांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते, तथापि ऐनवेळी शर्यत रद्द झाल्यामुळे त्यांचा हिरेमोड झाला.
Read also:
- दिलीपराव देशमुखांचा हट्ट पुतण्याने पुरवला; लातूरच्या शेतकऱ्यांना ५ लाख रुपये पर्यंत पीक कर्ज शून्य टक्के दराने मिळणार
- पक्षातील विरोधकांना धडा शिकवणार; नाना पटोलेंचा काँग्रेस नेत्यांना थेट इशारा
- …तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावालाच लागेल; मंत्री विजय वडेट्टीवार यांचा गंभीर इशारा
- तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलंस, मी आंघोळ करता करता थांबलो – नारायण राणे