मुंबई : शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाबद्दल मुख्यमंत्री उद्दव ठाकरेंना पत्र पाठवलं होतं. हे प्रकरण ताजं असताना परंडा विधानसभेचे शिवसेनेचे आमदार माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. तानाजी सावंत यांनी एसटीचे शासनात विलनीकरण करण्याची मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तानाजी सावंत यांची नाराजी सुरू आहे. त्यातच आता त्यांनी विलनीकरणाची मागणी केल्यामुळे नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
तानाजी सावंत यांच पत्र जसच्या तसं.!
प्रति,
मा. ना. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य, मुंबई- 32
!! यांसी सस्नेह जय महाराष्ट्र !!
विषय:– महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करणे बाबत..
महोदय,
उपरोक्त विषयान्वये विनंती की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या करिता एस. टी. कामगार संघटनांनी राज्यभर संप सुरू केलेला असून एस.टी. कामगारांच्या बऱ्याच मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत परंतु एस. टी. कामगार संघटना राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम असून विलीनीकरणासह अन्य मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची संघटनेने मागणी केलेली आहे.
त्या अनुषंगाने एस.टी. कामगार संघटनेचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासह अन्य मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा ही नम्र विनंती.
आपला स्नेहांकीत,
(प्रा.डॉ.श्री. तानाजी सावंत)
आमदार भूम-परंडा मतदारसंघ
Read also:
- भाजपचा मोठा मासा काँग्रेसच्या गळाला; ‘या’ दिग्गज नेत्याने दिला पदाचा राजीनामा
- शरद पवार यांच्या उपस्थितीत एसटी संपाबाबत महत्त्वाची बैठक; आंदोलनावर तोडगा निघणार?
- ४० वर्ष भाजपात होतो तेव्हा एकनाथ खडसे चांगला, अन् आता लगेचच वाईट? खडसेंचा भाजपला सवाल
- आता आमचं नवीन ठरलंय; जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीआधीच खासदार मंडलिकांनी उडवली खळबळ
- आम्हाला महाविकास आघाडीमध्ये कोणीच विचारत नाही; आमदार शहाजी पाटलांचा शिवसेनेला घरचा आहेर