सातारा : राज्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्षांची युती तुटली. मुख्यमंत्रीपदासाठी करण्यात आलेल्या तडजोडीमध्ये बऱ्याच कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा, विचारांचा एक प्रकारे बळी देण्यात आला.
बऱ्याच ठिकाणी शिवसेना आणि भाजपच्या तुटलेल्या युतीमुळे दोन्ही पक्षांना मोठा फटका बसला आहे. आम्हाला या सरकारमध्ये कोणीही विचारत नाही अशी खंत सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी बोलून दाखवली आहे. राज्यातील मंत्रीमंडळात माढा लोकसभा मतदार क्षेत्रातून एकही मंत्री नाही. आमच्यापैकी कुणालाही मंत्रीमंडळात घेतलं नाही, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
कोरोनाचे दूत बनू नका, नव्या नियमावलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती…
माझं सोडा, पहिल्यांदाच शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलो आहे. त्यामुळे मला आधीच गडबड करायची नाही, लांब बसायचं म्हणून सांगण्यात आलंय. पण ३०-३० वर्ष निवडून आलेल्या माजी आमदार बबनदादा शिंदे सारख्या लोकांनाही संधी देण्यात येत नाही. आम्हाला नाही वाटत या महाविकास सरकारमध्ये आम्हाला कोणी विचारतंय, घरची कोंबडी दाळ बरोबर अशी आम्हा सगळ्यांची अवस्था झालीय. गप्प बसायचं नाहीतर गावाकडे जायचं, एवढंच उरलंय,” असं म्हणत शहाजी पाटलांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला.
देशात कोरोनाचे थैमान, पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक; काय निर्णय घेणार?
माझ्या मतदारसंघात तसं पाहिलं तर शिवसेनेचं मताधिक्य अत्यंत कमी आहे. सांगोला तालुक्यात शिवसेनेची केवळ ११०० मते असूनही मी भाजपाच्या पाठिंब्यामुळे आमदार झालो, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या मुळे मला आमदारकी मिळाली आहे असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
Read also:
- बुधवारपेठेच्या वक्तव्यावरून गिरीष महाजनांनी खडसेंना सुनावलं; म्हणाले, त्यांचं डोकं फिरलं…
- गिरीष महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल – एकनाथ खडसे
- …म्हणून महापौर किशोरी पेडणेकरांना कोरोना आवडतो; भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- भाजप नेते गिरीष महाजन अडचणीत; पुणे पोलिसांची जळगावात छापेमारी
- शाळा बंद झाल्या, आता दारुची दुकानं बंद होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…