मुंबई : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय आवास दिवसानिमित्त ग्रामीण भागातील जनतेला गिफ्ट दिले आहे. ग्रामीण भागात विविध योजनांतर्गत 5 लाख 4 हजार घरकुलांना मंजुरी देणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी दिली. या योजनेसाठी जवळपास ७५० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र आणि सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी योजना इतर योजनांच्या अंतर्गत घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे.
राज्य शासनातर्फे ग्रामीण भागातील सर्वसाधारण क्षेत्रात 1 लाख 20 हजार निधी घरकुलांना दिला जाणार आहे. तर ,नक्षलग्रस्त भागात 1 लाख 30 हजार दिले जाणार आहेत. मनरेगाच्या माध्यमातून आणखी रोजगार म्हणून 18 हजार आणि शौचालय अनुदानासाठी 12 हजारांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्यातर्फे योजना राबवण्यात येत आहे. 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 कालावधीत ‘महा आवास अभियान-ग्रामीण’चे आयोजन करण्यात आले आहे.
केद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण योजनांतर्गत राज्याला 16 लाख 25 हजार 615 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्य सरकार महा आवास ग्रामीण अभियान-ग्रामीण योजेनेंतर्गत 5 लाख 3 हजार 886 घरकुलांना मंजुरी देणार आहे. यापूर्वी 11 लाख 21 हजार 729 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.
घरकुलांचे बांधकाम वेळेवर होण्यासाठी 33 हजार गवंड्यांना प्रशिक्षण व साहित्य संच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
विविध योजनांचा लाभ मिळणार
राज्य सरकारकडून घरकुल बांधकामासाठी जागा नसलणाऱ्या 73 हजार लाभार्थ्यांची जागेची अडचण दूर करण्यात येणार आहे. यासाठी दीन दयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत 50 हजारांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे. ज्या लाभार्थ्यांना अतिरिक्त अर्थसहाय गरजेचे आहे, त्यांना बँकांकडून 70 हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.’
घरकुल लाभार्थ्यांना स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी 12 हजार प्रोस्ताहनपर अनुदान देण्यात येणार आहे. मनरेगाच्या माध्यमातून 90 ते 95 दिवसांचा रोजगार दिला जाणार आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात येणार आहे. मोफत वीज जोडणी देखील देण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
महा आवास अभियान-ग्रामीण पूर्ण झाल्यानंतर या कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना सन्मानित करण्यात येणार आहे. विभाग, जिल्हा, तालुका ग्रामपंचायत आणि आदर्श लाभार्थी यांचा गौरव करण्यात येणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.
Read Also :
फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश
कोरोनामुळे दिल्ली-मुंबई विमानसेवा बंद होणार?
भगव्याचा रंग तुम्हीच फिका केला ; आशिष शेलारांचा सेनेवर हल्लबोल
31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार मुंबईतील शाळा; आयुक्तांचा निर्णय
“आता लवकरच महाराष्ट्रातही सत्तांतर होऊन राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल”