मुंबई : राज्य सरकारने अद्यापही मंदिरे उघडण्याबाबत असमर्थता दर्शवली आहे. तसेच, येणाऱ्या सणासुदीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर जनतेवर निर्बंध लावले असल्याने, विरोधी पक्षांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारच्या भूमिकेवर शंका व्यक्त करत, जळजळीत टीका केली आहे. “पी. साईनाथ म्हणतात ‘दुष्काळ आवडे सर्वांना’, तसं ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’ अशी अवस्था आहे,” असं ते म्हणाले.
ठाणे महापालिका अधिकाऱ्यावर अनधिकृत फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; मनसे आक्रमक
“लॉकडाऊनच्या काळात हजारो कामे ‘वाजवली’ जातायेत, त्याबद्दल कोण बोलत नाही. दुसरी लाट, तिसरी लाट भीती दाखवली जातीये. पण सगळं सुरुच आहे. राणेंची यात्रा झाली. इकडे यांची हाणीमारी सुरु झाली. भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. मग, इतरांनी मंदिरात जायचं नाही का? यांनी सभा घ्यायच्या, वाट्टेल ते करायचं, आम्ही दहीहंडी साजरी करायची नाही का? सगळे खेळ सगळं सुरु आहेत, मग सणांवरच बंदी का? म्हणून मी मनसैनिकांना दहीहंडी साजरा करण्याचा आदेश दिला,” असं ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारची ही ‘घोटाळा इलेव्हन’, किरीट सोमय्यांकडून ११ नावे जाहीर
“सण आला की लॉकडाऊन? सणांमधूनच रोगराई पसरते का? यांना हवंय ते सुरु आहे. विरोधी पक्षात असते तर यांनी काय केलं असतं? असेल नियम लावायचा तर सगळ्यांना एकच लावा ना! यांची बाहेर जायला फाटते, त्यात आमचा काय दोष?” असा टोला त्यांनी लगावला. “याच्या आधी देशात कधी रोगराई आली नाही? आत्ता सगळं बंद करायचं आणि आखणी झाली की निवडणूक जाहीर करायची. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्याची, मंदिरे उघडण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
भाजप आमदारांचा ५०० कोटींचा घोटाळा, भावना गवळींकडून ईडी चौकशीची मागणी
यावेळी, ठाण्यातील घटनेवर भाष्य करताना, “ठाण्यात परप्रांतीय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. ज्या दिवशी तो पोलिसांकडून त्यादिवशी तो आमच्याकडून मार खाईल. या सगळ्यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सगळी बोटे छाटली जातील आणि फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल. यांची हिम्मत होतेच कशी?” असा सवाल करत, “सरकार कशासाठी आहे? त्यांनी अशा लोकांवर बंधने आणली पाहिजेत,” असे सरकारला सुनावले.
Read Also :
- औरंगाबादच्या कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली; अनेक वाहनं दरडीखाली
- मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार; वाचा महापालिका प्रशासनाची नवी नियमावली…
- रासपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची माळ पुन्हा महादेव जानकारांच्या गळ्यात
- “एक ना एक दिवस आमचेही दिल्लीत दिवस येतील”, ईडीच्या छापेमारीवरून संजय राऊतांचा इशारा
- एसटी कर्मचाऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस सरसावले, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली विनंती