मुंबई : महामारीच्या काळात निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे, एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनियमितता निर्माण झाली आहे. त्यामुळे, त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात असून, स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून या कर्मचार्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करणारे पत्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
एस.टी. कर्मचार्यांचे अनियमित वेतन, एस.टी. महामंडळ कर्मचार्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक हालअपेष्टा, त्यातून एस.टी. कर्मचार्यांच्या होत असलेल्या आत्महत्या, यात तातडीने हस्तक्षेप करून त्यांना दिलासा देण्याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र…@OfficeofUT pic.twitter.com/NueP0UVkqa
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 30, 2021
मनसे आक्रमक, “ठाण्यात अडवले दादरमध्ये हंडी उभारू!”- संदीप देशपांडे
“एस. टी. महामंडळातील कर्मचार्यांना त्यांचे वेतन नियमितपणे मिळत नसल्याने, कुटुंबियांना आर्थिक दुष्टचक्रातून जावे लागत आहे. त्यामुळे, एस.टी. कर्मचार्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलायला सुरूवात केली आहे. अहमदपूर, तेल्हारा, शहादा, कंधार आणि साक्री अशा अनेक ठिकाणी एस.टी. कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्यावर्षी जळगाव येथे वाहक मनोज चौधरी आणि रत्नागिरी येथे पांडुरंग गडदे या एसटी कर्मचार्यांच्या आत्महत्येनंतरही आपल्याशी पत्रव्यवहार केला होता.
भाजप आमदारांचा ५०० कोटींचा घोटाळा, भावना गवळींकडून ईडी चौकशीची मागणी
मात्र, त्यानंतरही आत्महत्यांचे सत्र सुरूच राहिले. धुळे जिल्ह्यातील साक्रीत बेडसे नावाच्या एसटी कर्मचार्याने आत्महत्या करताना चिठ्ठीत वेतन मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट लिहिले होते. दुसरीकडे, या परिस्थितीत संताप व्यक्त करणार्या त्यांच्या संतप्त नातेवाईकांविरूद्धच पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या सर्व प्रकारामुळे एसटी कर्मचार्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
महाविकास आघाडी सरकारची ही ‘घोटाळा इलेव्हन’, किरीट सोमय्यांकडून ११ नावे जाहीर
त्यामुळे, माझी विनंती आहे, एसटी कर्मचार्यांच्या व्यथांकडे तातडीने लक्ष द्या आणि यात हस्तक्षेप करा. त्यांच्या वेतनाच्या समस्येवर तोडगा काढा आणि त्यांना दिलासा द्या. ते कर्मचारी नसून, आपले कुटुंबीय आहेत. आता त्यांचे कुटुंबीय प्रचंड मानसिक आणि आर्थिक तणावाखाली असताना, आपल्या स्तरावर या गंभीर प्रश्नाची तत्काळ सोडवणूक करावी, अशी विनंती,” असे त्यांनी म्हटले आहे.
Read Also :
- “एक ना एक दिवस आमचेही दिल्लीत दिवस येतील”, ईडीच्या छापेमारीवरून संजय राऊतांचा इशारा
- ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या गोटात घडामोडींना वेग, अनिल परब संजय राऊतांच्या भेटीला
- मोठी बातमी : शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर EDची धाड
- दहीहंडी साजरी करणार! मनसे-पोलीस आमने-सामने, पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
- “महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो”, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात