ठाणे : एकीकडे भाजपने मंदिरे उघडण्यासाठी ‘शंखानाद’ आणि ‘घंटानाद’ आंदोलन छेडले असताना, दुसरीकडे मनसेही दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, ठाण्यात दहीहंडी साजरी करण्यासाठी मंडप आणि स्टेज उभारणीचे काम सुरू असताना पोलिसांनी त्यावर कारवाई करून काम बंद पाडून, मनसेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना कोविड नियमांचं उल्लंघन केल्यामुळे नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.
मोठी बातमी : शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर EDची धाड
दरम्यान, “राज्यात राजकीय कार्यक्रमांना गर्दी होते ती चालते, मग हिंदू सण साजरे करायला बंदी का?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. तसेच, दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार नौपाडा मधल्या भगवती मैदानावर मनसेने दहीहंडी कार्यक्रमासाठी स्टेज बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र पोलिसांनीकाम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर, मनसैनिकांनी आंदोलन, घोषणाबाजी सुरू केली आणि मग पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले.
शिवसेना खासदार भावना गवळींना मोठा धक्का; ५ संस्थांवर ED ची छापेमारी
दुसरीकडे, महामारीचे नियम न जुमानता राज्यभरात मोठ्या गर्दीत राजकीय यात्रा आणि सभांना परवानगी आहे, हॉटेल्स, मॉल सुरु झाली मात्र, राज्यातली मंदिरे दीर्घकाळापासून बंद आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे येत्या आठ दिवसांत खुली करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून, आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलने सुरू आहेत. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे.
“महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो”, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
“मंदिरात जाण्यासाठी भाविकांना का रोखले जाते? फक्त मंदिरे उघडल्यानेच कोरोना वाढतो का? असे प्रश्न करत अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोध झुगारून थेट मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. नाशिक, नागपूर, पंढरपूर, पुणे आणि औरंगाबाद, शिर्डी परिसरातल्या स्थानिक भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मंदिर परिसरात घंटानाद आणि शंखनाद आंदोलन करत, मंदिरे उघडण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.
Read Also :
- “राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत, हि विकृती कधीही आहे, जाणार नाही”
- पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो तशी भाजपची अवस्था – नाना पटोले
- “हिंमत होती म्हणून लढलो, तुमच्यासारखा पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही”, मलिकांचा हल्लाबोल
- मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली? मंदिरे उघडण्यावरुन आक्रमक झालेल्या भाजपचा सवाल
- “… तर लोकांनी प्रार्थना करायला मातोश्रीवर जायचं का?” चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल