मुंबई : महामारीचे नियम न जुमानता राज्यभरात मोठ्या गर्दीत राजकीय यात्रा आणि सभांना परवानगी आहे, हॉटेल्स, मॉल सुरु झाली मात्र, राज्यातली मंदिरे दीर्घकाळापासून बंद आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे येत्या आठ दिवसांत खुली करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून, आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलने सुरू आहेत. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे.
“… तर लोकांनी प्रार्थना करायला मातोश्रीवर जायचं का?” चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
दरम्यान, यावेळी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. “मंदिरे उघडा नाहीतर आम्ही नियम तोडू. आज श्री कृष्ण जन्माष्टमी आहे. संपूर्ण देशात मंदिरे उघडण्यात आली आहेत. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एवढे अधार्मिक का? त्यांचा धर्म कुठे गेला? ते कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत? कोणाला खुश करण्यासाठी ते काम करत आहेत?” असे अनेक सवाल करत त्यांनी, “नियम पायदळी तुडवून, मंदिरे उघडू, मग सरकारने हवी ती कारवाई करावी,” असा इशारा दिला आहे.
“शुद्धीत येऊन बोला! ‘ते’ आदेश केंद्राचेच”, शंखनाद आंदोलनावरून वडेट्टीवारांनी भाजपला सुनावले
“मंदिरात जाण्यासाठी भाविकांना का रोखले जाते? फक्त मंदिरे उघडल्यानेच कोरोना वाढतो का? असे प्रश्न करत अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोध झुगारून थेट मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. नाशिक, नागपूर, पंढरपूर, पुणे आणि औरंगाबाद, शिर्डी परिसरातल्या स्थानिक भाजप नेत्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मंदिर परिसरात घंटानाद आणि शंखनाद आंदोलन करत, मंदिरे उघडण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे.
मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक; पुण्यात कसबा तर पंढरपुरात विठ्ठल मंदिरात कार्यकर्ते घुसले
दुसरीकडे, चंद्रकांत पाटील यांनी कसबा गणपती मंदिरासमोर आंदोलन करत, “या आंदोलनाच्या दबावामुळे सरकार आज संध्याकाळपर्यंत मंदिरं उघडण्याचे आदेश देईल. धार्मिक स्थळं बंद असतील तर सर्वांनी पूजा-प्रार्थनेसाठी काय मातोश्रीवर जायचं का?, आम्ही आवश्यक त्या कारवाईला समोर जायला तयार आहोत. पण हिंदूंच्या भावना आता सरकारला दुखावू देणार नाही,” असे सवाल करत त्यांनी मंदिर परिसरात घंटानाद आणि शंखनाद आंदोलन केलं.
Read Also :
- परब यांचा करण्यात आला ‘करेक्ट कार्यक्रम’? फडणवीसांकडून आली प्रतिक्रिया
- टल्ली लोक चालतात, तल्लीन भक्त नको? मुख्यमंत्री ठाकरे धर्मयुद्धासाठी तयार राहा; भाजप आक्रमक
- नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना मारल्या शिवाय स्वस्त बसणार नाही; शिवसैनिकाच्या वक्तव्याने खळबळ
- तब्बल 20 वर्षानंतर गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंच्या घरी गेले; काय होत नेमकं कारण? वाचा सविस्तर…
- जन आशीर्वाद यात्रेतून भाजप कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहे – अजित पवार