मुंबई : सध्या भाजपचे केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ‘जन आशीर्वाद’ यात्रेदरम्यान महाविकास आघाडी सरकारवर, तसेच शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या जहाल वक्तव्यांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेना खासदार भावना गवळींना मोठा धक्का; ५ संस्थांवर ED ची छापेमारी
“कायदेशीर लढा जो आहे, तो लढावाच लागेल. आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही लढलो. तुमच्यासारखे पक्ष बदलून केंद्रीय मंत्री झालो नाही. त्यामुळेच, ज्यांच्यात हिंमत नाही, ते पक्ष सोडून भाजपत जात आहेत,” असा जोरदार हल्ला त्यांनी चढवला आहे. तसेच, भाजप केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे आणि बेजबाबदारपणे कृत्य करत आहे,” अशी टीका त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजप आणि नारायण राणेंवर केली.
परब यांचा करण्यात आला ‘करेक्ट कार्यक्रम’? फडणवीसांकडून आली प्रतिक्रिया
तसेच, परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने जारी केलेल्या नोटीशीवरूनही त्यांनी भाजपला लक्ष्य केलं. ” राणेंना अटक झाल्यानंतर, ईडीची त्यांना नोटीस येईल, हे अपेक्षितच होते. आता अनिल परब यांना ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जाईल. भाजपचे हे सूडबुद्धीने राजकारण सुरू आहे आणि याबाबत आता लोकांच्या मनात कोणतीही शंका राहिलेली नाही,” असा घणाघात त्यांनी भाजपवर केला. त्यामुळे, राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमधला संघर्ष शिगेला पोहोचला असल्याचे यातून पाहायला मिळत आहे.
मोठी बातमी : शिवसेना मंत्री अनिल परब यांना ED ची नोटीस, ठाकरे सरकारला मोठा धक्का
दुसरीकडे, २९ ऑगस्टला सकाळी १०० कोटी खंडणी प्रकरणी मुख्य आरोपींपैकी एक असलेले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लीनचीट दिली गेली असल्याच्या बातम्या सर्व प्रकारच्या माध्यमांत पसरल्या होत्या. यानंतर यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात वाक्युद्ध सुरु झाले. त्यानंतर सीबीआयने स्पष्टीकरण देऊन सांगितले; कि “कोणतीही क्लीन चिट दिली गेली नाही.”
Read Also :
- मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली? मंदिरे उघडण्यावरुन आक्रमक झालेल्या भाजपचा सवाल
- “… तर लोकांनी प्रार्थना करायला मातोश्रीवर जायचं का?” चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक; पुण्यात कसबा तर पंढरपुरात विठ्ठल मंदिरात कार्यकर्ते घुसले
- टल्ली लोक चालतात, तल्लीन भक्त नको? मुख्यमंत्री ठाकरे धर्मयुद्धासाठी तयार राहा; भाजप आक्रमक
- “शुद्धीत येऊन बोला! ‘ते’ आदेश केंद्राचेच”, शंखनाद आंदोलनावरून वडेट्टीवारांनी भाजपला सुनावले