मुंबई : सध्या भाजपचे केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ‘जन आशीर्वाद’ यात्रेदरम्यान महाविकास आघाडी सरकारवर, तसेच शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या जहाल वक्तव्यांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यातच आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत आहेत, त्यांचा स्वभाव जाणार नाही. ही विकृती आहे,” असा घणाघात त्यांनी केला आहे.
“हिंमत होती म्हणून लढलो, तुमच्यासारखा पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही”, मलिकांचा हल्लाबोल
तसेच त्यांनी अनिल परब यांच्यावर ईडीकडून केलेल्या कारवाईवरही प्रतिक्रया दिली असून, “ईडीची कारवाई म्हणजे केंद्र सरकारच्या सुडाचं राजकारण आहे. त्याच भावनेतून त्यांना नोटीस देण्यात आली आहे, हे ठरवून केले जात आहे. केंद्राकडून तपास यंत्रणांचा दुरूपयोग केला जात आहे,” असा घणाघात त्यांनी भाजपवर केला आहे. तसेच, “राणेंच्या नौटंकीनंतर कोकणात ‘राणेयुक्त’ राडेबाज विकृती फोफावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणवासीयांनी आता सावध राहावं,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.
शिवसेना खासदार भावना गवळींना मोठा धक्का; ५ संस्थांवर ED ची छापेमारी
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वस्वी लोकहिताची कामे करत आहेत. त्यामुळे त्यांना रणनीती आखण्याची गरज नाही. शिवसेनेला वाडीपर्यंत वाढवू, काहीही झालं तरी कोकण शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे,” असं सांगत, “राणेंच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेसाठी ७५ गाड्या मुंबईतून नेल्या गेल्या. त्यांच्या यात्रेला स्थानिकांचा अजिबात प्रतिसाद नव्हता,” असा दावा त्यांनी केला. “न्याय संस्थेवर आमचा विश्वास आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला कोर्ट शिक्षा देईल,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली? मंदिरे उघडण्यावरुन आक्रमक झालेल्या भाजपचा सवाल
यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांवर देखील निशाणा साधला. “चंद्रकांत पाटलांसारख्या व्यक्तीने तरी अशी वक्तव्ये करू नयेत. त्याच्यामुळे, केंद्राच्या आदेशाला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. आम्ही गर्दी कमी करायला सांगत आहोत, तर भाजप यात्रा घेत आहे. त्यामुळे गर्दी होत आहे आणि कोरोना वाढत आहे. याला सर्वस्वी भाजप जबाबदार आहे,” असा थेट आरोप करत त्यांनी पाटील यांच्यावर आणि भाजपच्या मंदिरांबाबतच्या आंदोलनावर टीका केली आहे.
Read Also :
- “… तर लोकांनी प्रार्थना करायला मातोश्रीवर जायचं का?” चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- परब यांचा करण्यात आला ‘करेक्ट कार्यक्रम’? फडणवीसांकडून आली प्रतिक्रिया
- “शुद्धीत येऊन बोला! ‘ते’ आदेश केंद्राचेच”, शंखनाद आंदोलनावरून वडेट्टीवारांनी भाजपला सुनावले
- मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक; पुण्यात कसबा तर पंढरपुरात विठ्ठल मंदिरात कार्यकर्ते घुसले
- टल्ली लोक चालतात, तल्लीन भक्त नको? मुख्यमंत्री ठाकरे धर्मयुद्धासाठी तयार राहा; भाजप आक्रमक