मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील जिल्हा, शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते शिवसेनेतून बाहेर पडत आहेत. शिवसेनेतील ही फुट रोखण्यासाठी शिवसेना नेते ठिकठिकाणी मेळावे घेत आहेत. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेही निष्ठा यात्रा करत ठिकठिकाणी भेट देत कार्यकर्त्यांशी सवांद साधत आहेत. याच निष्ठा यात्रेवरून आता मनसेचे नेते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे..
“लबाड लांडगे ढोंग करतायत, दिलासा द्यायचं सोंग करतायत”
त्यांनी त्या संदर्भात एक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, छोटे नवाब याच्या निष्ठा यात्रेचे तर उलटे परिणाम दिसु लागलेत आहेत. सेनेच्या आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी पण यांचा पक्ष सोडू लागले.. आता त्यांना लवकरच शिल्लक यात्रा काढावी लागणार असं चित्र दिसतंय, असं ट्विट करत काळे यांनी आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेवर टोला लगावला आहे.
शरद पवारसाहेबांनी देखील द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा; नवनीत राणांची मागणी
या अगोदर देखील गजानन काळे यांनी शिवसेनेच्या इतर आमदार खासदारांवर टिका केली आहे. खास करून ते आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने टिका करताना दिसत आहेत. जो बूँद से गयी वो पत्र से नही आती..। खंगार, कोथळा, लाकूडतोड्याची गोष्ट, बंधन, शपथा, प्रतिज्ञापत्र यानंतर नवाबसेनेच्या पक्षप्रमुखांच शिल्लक आमदारांना प्रेमपत्र, शिवसेनेने भोंगा हे चिन्ह घ्या. म्हणजे दिवसातून चार पाच वेळा वाजेल असे ट्विट करत मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेना नेत्यांना सातत्याने धारेवर धरलं आहे.
गुलाल उधळण्यास विलंब होणार; स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना स्थगिती
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतलेले औरंगाबादचे संभजीनगर, उस्मानाबादचं धारशिव आणि मुंबई विमानतळाचे दी. भा. पाटील ही नावे दिल्याचा निर्णय शिंदे सरकारने स्थगित कऱण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून देखील शिंदे आणि फडणवीस सरकार हिंदुत्वद्रोही आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोला लगावला आहे.
Read also
- “उद्धव ठाकरेंनी घेतलेले चुकीचे निर्णय थांबवले जातील”; नामांतराच्या निर्णयावरून सत्तारांची प्रतिक्रिया
- “औरंगजेब सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही”
- उद्धव ठाकरेंचा ऑगस्टपासून महाराष्ट्रात झंझावत दौरा! बंडखोरांना जोरदार प्रत्युत्तर देणार
- उद्धव ठाकरेंना शिंदेंचा मोठा धक्का; औरंगाबादसह, उस्मानाबाद नामांतराला स्थगिती
- “ज्या आमदारांना एकनाथ शिंदेंचा फोन जाईल, तो मंत्री बनेल”; अब्दुल सत्तरांचं सुचक वक्तव्य