मुंबई : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. आता हे निर्बंध 31 मे पर्यंत वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकाचा अनलॉकबाबत ठोस ‘एक्झिट प्लॅन’ काय आहे ? असा सवाल केला आहे.
कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक घटकांना आर्थिक फटका बसला आहे. नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, तसेच अनेक उद्योगधंदे देखील बंद झाले आहे. यासंदर्भातील देखील प्रश्न देशापांडे यांनी उपस्थित केले.
सरकारचा unlock चा exit plan आहे का?नेमकी किती रुग्ण संख्या झाली की सरकार निर्बंध शिथिल करणार आहे?मंत्रिमंडळात lockdown वर चर्चा होते तशी बेरोजगारी, बुडालेले उद्योगधंदे, वीजबिल,जनतेचे आर्थिक नुकसान,बँकांचे हप्ते यावर चर्चा होत असेल का?यावर ठोस उत्तर सरकार देईल का?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 13, 2021
संदीप देशपांडे म्हणाले की, सरकारचा अनलॉकचा एक्झिट प्लॅन आहे का? नेमकी किती रुग्ण संख्या झाली की सरकार निर्बंध शिथिल करणार आहे? मंत्रिमंडळात लॉकडाऊनवर चर्चा होते तशी बेरोजगारी, बुडालेले उद्योगधंदे, वीजबिल ,जनतेचे आर्थिक नुकसान, बँकांचे हप्ते यावर चर्चा होत असेल का? यावर ठोस उत्तर सरकार देईल का?, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
दरम्यान, रुग्णसंख्येत आणखी घट होण्यासाठी राज्यात 15 मेपर्यंत लागू केलेले निर्बंध 31 मेपर्यंत वाढवावेत, असे मत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे राज्यात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे.
Read Also :
- ‘स्वतःच्या कौतुकाची टिमकी वाजवणाऱ्या ठाकरे सरकारचे न्यायालयानेच वाभाडे काढले’
- ‘पटोले हे विनोदी कलावंत, त्यांना गांभीर्याने घ्यायचे कारण नाही’
- एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या बदलीला ब्रेक, मॅटकडून स्थगिती
- ‘मराठा आरक्षणासाठी 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा’
- ‘राजेश टोपेंचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’