हावडा : आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी पश्चिम बंगालमधील राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा गड असलेल्या बंगालमध्ये झेंडा फडकविण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेकजण पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील सातत्याने ममता बॅनर्जींवर टीका करत आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी ममता बॅनर्जी यांच्या बाजूने कोणीही असणार नाही, असा दावाच अमित शहा यांनी केला आहे. एका जाहीर सभेत ते बोलत होते.
Leaders of Trinamool Congress & other parties are joining Bharatiya Janata Party. Mamata di will find herself alone by the time election happens. She has done injustice to people of State:Union Home Min & BJP leader Amit Shah addresses party rally in Howrah via video conferencing pic.twitter.com/1fqsASHe3j
— ANI (@ANI) January 31, 2021
ममता बॅनर्जींच्या भाच्याला राज्याचा पुढील मुख्यमंत्री बनवणे हा तृणमूल काँग्रेसचा अजेंडा आहे, असे म्हणत देखील अमित शहांनी निशाणा साधला. निवडणूक संपल्यानंतर ममता बॅनर्जी स्वतःला एकट्या उरल्याचं पाहातील. राज्यातील जनतेबरोबर त्यांनी अन्याय केला आहे. त्यांनी पश्चिम बंगलला प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर नेलं आहे. राज्यातील जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असे ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची मागील काही दिवसात रांगच लागली आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील अनेक मोठे नेते भाजपकडे जात आहे. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Read Also :
- तात्याराव लहानेंच्या फडणवीस सरकारवरील ‘त्या’ आरोपांवर दरेकर म्हणाले…
- … त्यासाठी मी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानतो – रोहित पवार
- राहुल गांधींना त्वरित अध्यक्ष करा, दिल्ली काँग्रेसकडून प्रस्ताव मंजूर
- ‘शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत, पण…’, केंद्रीय कृषीमंत्र्यांचे प्रत्युत्तर
- छत्रपती शिवाजी महाराज कन्नड भूमीतले, कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचा विचित्र दावा