बंगळुरू : महाराष्ट्र-कर्नाटकमधील वाद हा आता सीमेवरून थेट छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहचल्याचे पाहण्यास मिळत आहे. बेळगावसह मुंबईवर देखील दावा ठोकल्यानंतर आता कर्नाटकच्या मंत्र्यांकडून थेट शिवाजी महाराजांवर हक्क दाखवण्यास सुरुवात झाली आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कार्जोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे कन्नड भूमीतील असल्याचा अजब दावा केला आहे.
ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे नाव शिवाजी महाराजांच्या नावावरून ठेवले असले तरी शिवाजी महाराज कन्नड होते हा इतिहास ठाकरे यांना माहिती नाही. शिवाजी महाराजांचे पूर्वज बेलीयप्पा हे गदग जिल्ह्यातील सोरतूरचे होते. गदग जिल्ह्यात दुष्काळ पडल्यानंतर ते महाराष्ट्रात गेले. शिवाजी महाराज हे त्या घराण्यातील चौथ्या पिढीतील प्रतिनिधी होते, असा दावा गोविंद कार्जोळ यांनी केला आहे. कार्जोळ यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे.
तर यापूर्वी सीमावादावर बोलताना कर्नाटकचे आणखी एक उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मुंबई देखील कर्नाटकाचाच भाग असल्याचा दावा करत, मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी करणार असल्याचे म्हटले होते. तसेच, महाविकास आघाडीमधील मतभेद झाकण्यासाठी उद्धव ठाकरे सीमावादाचा मुद्दा उकरून काढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Read Also :
- संजय राऊतांच्या लेकीचा साखरपुडा संपन्न, जावई आहेत तरी कोण ?
- आज अर्थसंकल्प! अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकार कोणत्या घोषणा करणार ?
- विधान परिषदेत पॉर्न पाहताना आढळला काँग्रेस आमदार ? स्पष्टीकरण देताना म्हणाला…
- ‘हायवेवर शिवसैनिकांनी काढली बंदूक, आणि…’, गृहमंत्र्यांपर्यंत पोहचलं प्रकरण
- ‘संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा’