नागपूर : कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरातधील तेली जातीत झालेला आहे. असा तिरपागडा आरोप करून संपुर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याने भाजपाने त्यांच्याविरूद्ध कंबर कसली आहे. शुक्रवारी राज्यभर निषेध आंदोलन भाजपकडून घोषित केले आहे. महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने नागपुर येथे संविधान चौकात तसेच प्रत्येक जिल्हा व तालुका केंद्रावर शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी आंदोलन करणार असल्याची घोषणा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख यांनी केली आहे.
हेही वाचा…“शिंदे गँग च्या डोक्यावर आणखी एक मानाचा तुरा”, राऊतांचे सलग चार दिवस ट्विटवॉर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झालेला आहे, गुजरातमध्ये सन २००० मध्ये ओबीसीत आणली असून मोदी यांचा जन्म सामान्य जातीत झाला. त्यांनी कास्ट सेन्सेलला विरोध केला. कारण त्यांचा जन्म ओबीसीत झालेला नसून सामान्य जातीत झालेला आहे असे बेताल व निर्ल्लज उदगार कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ओरिसातील सभेत काढले असून, राहुल यांचा हा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समजाचा अपमान आहे, असा आरोप आशीष देशमुख यांनी केला. नागपूर येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा….“राजकारणात बाप बदलण्याची नवीन पद्धत आली”, शरद पवार गटाचा जोरदार घणाघात
ओबीसी विरोधात षडयंत्र !
ते म्हणाले की, राहुल गांधी हे गांधी कुटुंबात जन्माला आले असून त्यांचा इटालियन कुटुंबाशी संबंध आहे. या लॉजिक प्रमाणे ते स्वत: भारतीय नागरिक ठरू शकत नाही. काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षण विरोधात राहली आहे. पंडीत नेहरू यांनी सन १९५३-५४ मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या सिफारशींचा विरोध केला होता. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला विरोध केलेला आहे. इंदिरा गांधीनी मंडल आयोग रद्दीत टाकला होता.
डॉ. देशमुख म्हणाले की, राहुल गांधीच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीत ; कारण त्या सर्व पूर्वी सामान्य वर्गात होत्या. पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे. एखाद्या जातीची ओबीसी विभागणी होण्यापूर्वी ज्या व्यक्तीचा अशा जातींमध्ये जन्म झाला त्यांचे आरक्षण राहुल गांधी काढून घेण्याच्या तयारीत आहे. कॉंग्रेस तेली समाजाला ओबीसी पासून वेगळे करण्याचा आणि ओबीसींचा एक वर्ग कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतके वर्ष धर्म आणि जातीवरून फूट पडून ते आता ओबीसीमध्ये सुध्दा फूट पाडत आहेत, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…कोण आहे मॉरिस नरोन्हा ? फेसबुक लाईव्हमध्येच ठाकरे गटाच्या नेत्याला संपवलं, घटनेचा थरारक CCTV व्हिडीओ
हेही वाचा…महाराष्ट्र हादरलं…! ठाकरे गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून ह’त्या’, आरोपींनीही स्वत: ला संपवलं
हेही वाचा…“..म्हणून काँग्रेस पक्ष सोडला”, बाबा सिद्दीकींनी सांगितलं कारण, ‘त्या’ पक्षाची ताकद वाढवणार
हेही वाचा…शिवसेना पक्ष सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरूंगात जा,” ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याला शिंदे गटाच्या धमक्या
हेही वाचा…“पुण्यात अजित पवार गटाने कार्यालयावर ताबेमारी केली तर..” जयंत पाटलांनी दिला थेट इशारा